संगमनेर प्रतिनिधी १ मे,महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेर बसस्थानकासमोरील कॉर्नर येथे संगमनेर युवक काँग्रेस, डाॅ. जयश्री थोरात आणि समविचारी संघटनांच्या पुढाकाराने ‘समता मिसळ’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या सामाजिक सलोख्याच्या कार्यक्रमाला संगमनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून हजारों नागरिकांनी मिसळचा आस्वाद घेतला.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, मिसळ तयार करण्यासाठी लागणारा सर्व शिधा विविध समाजघटकांकडून एकत्र आणण्यात आला होता. जात-पात, धर्मभेद विसरून नागरिक एकत्र आले आणि एकतेचा स्वाद चाखत सामाजिक समतेचा संदेश दिला.
या प्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब_थोरात म्हणाले, “देशात जात-धर्माच्या आधारे भेदभाव न होता, एकतेतूनच देशाला खरी ताकद प्राप्त होते. ‘समता मिसळ’ हा त्याचा आदर्श नमुना आहे.”
या कार्यक्रमास मा.आ.डॉ. सुधीर तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, सौ.दुर्गा तांबे तसेच समविचारी संघटना, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव
सर्व समाजबांधव,युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.