हिवरगाव पावसा येथे चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य जयंती उत्साहात

Cityline Media
0
बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना जयंतीनिमित्त खाऊ वाटप 

संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव)
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बुद्ध विहारात चक्रवर्ती सम्राट यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.म.फुले, डॉ.आंबेडकर,
राजश्री शाहू विचार मंच आणि आणि बालसंस्कार केंद्र हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रसंगी येथील बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.त्यावेळी बालसंस्कार केंद्राचे संचालक  नितीनचंद्र भालेराव,बालसंस्कार केंद्राचे समन्वयक बच्चन भालेराव यांच्या सह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हिवरगाव पावसा येथे प्रथमच चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली.त्या प्रसंगी सम्राट अशोक यांचा गौरवशाली इतिहास,धम्मकार्य त्यांनी केलेला धम्माचा प्रचार, प्रसाराचे कार्य,लेण्यांची निर्मिती बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी दिलेले पाठबळ याची माहिती नितीनचंद्र भालेराव यांनी दिली.

इसवी सन पूर्व 304 मध्ये पाटलीपुत्र येथे सम्राट अशोक यांचा जन्म झाला.सम्राट चंद्रगुप्त मौर्य,सम्राट बिंदुसार यांच्यानंतर मौर्य वंशातील तिसरे सम्राट अशोक मौर्य यांनी अखंड भारत वर्षात मौर्य साम्राज्याचा विस्तार केला.परंतु मौर्य साम्राज्यात कधी समाविष्ट न झालेले कलिंग वर स्वारी केली तेव्हा प्रचंड मनुष्य हानी आणि रक्तपात झाला.या लढाईत सम्राट अशोक यांचा मोठा विजय झाला परंतु सम्राट अशोक समाधानी झाले नाही.त्यानंतर बौद्ध भंतेजी यांच्या उपदेशामुळे भगवान बुद्ध यांचे विचार व तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

सम्राट अशोक यांनी राज्यात मनुष्य मात्रासाठी विविध सोयी सुविधा निर्माण केल्या.प्राणी हत्या बंद केली,प्राण्यांसाठी,पशुपक्षांसाठी औषध उपचारासाठी सोयी सुविधा निर्माण केल्या.
जनावरांसाठी रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाक्या,हौद यांची निर्मिती केली, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. सम्राट अशोक यांच्या कार्यकाळात हजारो बौद्ध लेण्यांची निर्मिती करण्यात आली.त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले.त्याबद्दल सविस्तर माहिती म.फुले, डॉ.आंबेडकर,
राजश्री शाहू विचार मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी विद्यार्थ्यांना दिली.

चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त श्रीकांत भालेराव यांच्या वतीने बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक बौद्धाचार्य गौतम भालेराव, बालसंस्कार केंद्राचे समन्वयक बच्चन भालेराव,मुकेश दारोळे,यांच्या सह कला सम्राज्ञी पवळा कला मंच व भीमशक्ती तरुण मित्र मंडळाचे सहकार्य मिळाले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!