आमच्या कारकिर्दीत आत्ता पर्यंत वरवंडी गावात कोटीपर्यंतची विकास कामे पुर्ण-सरपंच सौ.किरण गागरे

Cityline Media
0
लवकरच लोकार्पण सोहळा.

संगमनेर (प्नतिनिधी) लोकप्रतिनिधींची तिरकस नजर आणि लोकसेवकांचा अल्पसा वेळ या कारणाने नेहमीच शासनाच्या अनेक योजना,सोयी सुविधा यापासून कायम वंचित राहिलेल्या संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी गावामध्ये गेल्या दीड वर्षात एक कोटी रुपये पर्यंतचे विकास कामे पूर्ण झाले असून लवकरच या कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती वरवंडीचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.किरण गणेश गागरे यांनी नुकतीच दिली.
संरपच सौ किरण गागरे यांनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार वरवंडी स्मशान भूमी दक्षिण संरक्षक भिंत बांधकाम ,पेवर ब्लॉक बसविणे ,दावल मलिक बाबा मंदिर सभा मंडप बांधकाम ,कुंभारवाडी हनुमान मंदिर शेजारी संरक्षक भिंत बांधकाम करणे ,स्मशानभूमी बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे ,चौधरवाडी स्मशानभूमी शेजारी संरक्षक भिंत बांधणे , जि.प.शाळा संरक्षक भिंत बांधकाम व गेट बसविणे ,जि.प. शाळा पेव्हर ब्लॉक बसविणे , ग्रामपंचायत कार्यालय समोर पेविंग ब्लॉक बसविणे ,जि. प. शाळा वरवंडी पेवर ब्लॉक बसविणे ,संरक्षक कंपाऊंड करणे ,सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन , जि. प. शाळा छत दुरुस्ती करणे ,जि. प शाळा वरवंडी, वर्पे वस्ती ,सहाणे वस्ती,चौधरवाडी, कुंभारवाडी डिजीटल करणे ,जि. प.शाळा सहाणे वस्ती पेव्हर ब्लॉक बसविणे ,वरवंडी , कुंभारवाडी, चौधरवाडी, स्थपलिंग देवस्थान येथे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे ,वरवंडी, चौधरवाडी,कुंभारवाडी सांडपाणी व्यवस्थापन भूमिगत गटार तयार करणे , ठाकरवाडी, वरवंडी, दलित वस्ती,यरमल वस्ती, बकुळे वस्ती, गागरे वस्ती, गावठाण मुख्य रस्ते,येथे सौर पथ दिवे बसविणे ,ग्रामपंचायत वरवंडी ते सोसायटी रस्ता काँक्रीटीकरण करणे ,स्थपलिंग घाट ते स्थापलिंग देवस्थान सौर पथ दिवे बसविणे ,जि.प शाळा वरवंडी, वर्पे वस्ती ,सहाणे वस्ती,चौधरवाडी, कुंभारवाडी सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे ,चौधरवाडी घाट संरक्षक भिंत बांधकाम करणे , गावात सुरक्षा यंत्रणा सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे ,चौधरवाडी विहीर बांधकाम करणे ,पाणी पुरवठा विहीर वरवंडी ते पाण्याची टाकी पाइपलाइन करणे , सार्वजनिक शौचालय बांधकाम वरवंडी ,सार्वजनिक शौचालय बांधकाम सहाणे मळा वस्ती शाळा ,वर्पे वस्ती तासाचा ओढा सी.डी वर्क पूल बांधकाम करणे ही विकासात्मक कामे पूर्ण झाली असून लोकप्रतिनिधी अभावी या कामांची उट्घाटने झाली नाही तरी लवकर या झालेल्या कामांची उट्रघाटन लवकरच होईल असा विश्वास संरपच सौ गागरे यांनी व्यक्त केला.

वरवंडीतील जल जीवन मिशन पाणी योजना रामभरोसे.
वरवंडी हे शासनाच्या अनेक योजना पासून वंचित आहे दर पन्नास वर्षांनी येथे ढगफुटी सदृश्य पर्जन्य वृष्टी होते. आधे मध्ये देखील भरपूर पाऊस होतो परंतु शासनाचे कुठलेही नियोजन व पाणी आडवा पाणी जिरवा संबंधी कुठलाही कार्यक्रम नसल्याने सरकारच्या जिल्हा नियोजन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि पाणी पुरवठा विभागाचे कुठलेही नियोजन नसल्याने हे सर्व पाणी साचून न राहता ते मुळा धरणात वाहून जाते.पावसाळा संपताच येथील बोर विहिरी तळे पाण्याचे स्त्रोत कोरडे ठाक होतात मग लागोलागच शासनाला पिण्याच्या पाण्याची सुविधा टँकरद्वारे करावी लागते, उन्हाळ्यात येथील काही लोक स्थलांतर करतात ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. वरवंडी गाव पाणीदार होता होता राहिले आहे पाण्याची वाट पाहून येथील कित्येक पिढ्या खपल्या आहे.

 वरवंडी व ४ गांवे पाणी पुरवठा योजनेचे कामे ४० ते ५० टक्के झाले असून या दुष्काळी पठार भागातील गावांना स्वच्छ ,निर्मळ व मुबलक पाणी कधी मिळेल यांची होणाऱ्या कामावरुन अद्याप शाश्वती नसून या तंत्रज्ञान युगात ही गावांतील महिलांना पाण्याकरिता वणवण करावी लागते की काय ? अशी शंका संरपच सौ किरण गागरे यांनी उपस्थिती केली .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!