पुरावे देऊनही व्यापाऱ्यांचे पुनर्वसन न झाल्यास तीव्र आंदोलन-सुभाष त्रिभुवन
श्रीरामपूर (दिपक कदम) शहरातील विस्थापित झालेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करावे यासाठी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांचे गेली ४०-५० वर्षापासून विविध व्यवसाय असलेल्या दुकानाचे शॉप ॲक्ट लायसन लाईट बिल नगरपालिकेची डेली पावती आधार कार्ड असे पुरावे श्रीरामपूर नगरपालिकेला सादर केले आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेने २८ जानेवारी रोजी श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणाच्या नावाखाली विविध व्यावसायिकांचे दुकाने उध्वस्त करून व्यापाऱ्यांना दारिद्र्याच्या घाईत लोटले आहे त्या विस्थापित व्यापाऱ्यांना न्याय मिळावा त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे
या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सलग १६ दिवस विस्थापित व्यापाऱ्यांनी सामूहिक धरणे आंदोलन आमरण उपोषण केले होते त्याची दखल घेऊन श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी विस्थापित दुकानदारांचे पुनर्वसन करण्याबाबत श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीला लेखी आश्वासन दिले होते.
त्यासंदर्भात ज्या ज्या दुकानदारांचे अतिक्रमणामध्ये दुकाने काढली गेली आहे त्यांनी आपल्या दुकानाचे शॉप ॲक्ट लायसन लाईट बिल नगरपालिकेची डेली पावती असे पुरावे देण्यासाठी कळवले होते त्यामुळे व्यापाऱ्यांनी सर्व पुरावे श्रीरामपूर नगरपालिकेकडे सादर केले आहे.
तरी लवकरात लवकर विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे अन्यथा श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने मोठे उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे कारण श्रीरामपूरातील विविध व्यावसायिकाचे दुकाने काढून त्या ठिकाणी दोन चाकी चार चाकी वाहने दिवसभर उभे राहतात
नेमके श्रीरामपूर नगरपालिकेने व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी गाड्यांची पार्किंगची सोय केली की काय हा व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर करावा अन्यथा व्यापाऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा व्यापाऱ्यांच्या वतीने देण्यात आला त्यावेळी मर्चंट
असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शांतीलाल पोरवाल योगेश ओझा ऋषी कासलीवाल विशाल सावद्रा फयाज पठाण अक्षय गवळी सुनील दंडवते फयाज पठाण शाहिद बागवान वसीम बागवान रवी चव्हाण संदीप भावसार निलेश मोरगे सुरज बर्थडे शाहरुख मंसुरी
श्रीकांत श्रीकांत वाबळे योगेश बरबडे दीपक खैरनार उत्तम चित्ते अनिल हारदे प्रशांत कुलकर्णी वणेश कुवर भारती वाणी रवींद्र कोरडे अभिषेक कल्याणकर श्रीकृष्ण लावर दिगंबर सोनवणे अरुण विसपुते प्रदीप निकम जावेद अत्तार अमोल तुपे अनिल हारदे भागवत संत बाबुलाल मांडन नामदेव पवार मजीद मेमन श्रीराम निकुंभ सुदाम गव्हाणे अधिक बागवान अशोक लोणकर जावेद आता विठ्ठल जावळे यशवंत चव्हाण शिवनाथ जगदाळे सूर्यकांत बारस्कर राकेश थोरात सुरेश ठाकरे पंकज गंगवाल रावसाहेब राऊत नामदेव पवार दत्तात्रेय गरजे आधी विस्थापित व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.