शेती: घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला प्रतिवारी नुसार चार ते पाच रुपये तर काही ठिकाणी अडीच रुपये आकारले जात आहे. किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये दर मिळाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
मध्यंतरी पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दराने शंभरी गाठली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले,राहाता या सर्व भागात टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यात दुसऱ्या राज्यातूनही टोमॅटोची आवक होत असल्याने येथे टोमॅटोचे दर घसरले आहेत.
टोमॅटोला अडीच रुपयांचा भाव, शेतकरी पुन्हा संकटात
टोमॅटोचा
हब असलेल्या नगरच्या मार्केट मध्ये टोमॅटो एकेकाळी दोनशे रुपये
प्रतिकिलोने विकला गेलाय, मात्र आता टोमॅटोचे दर थेट अडीच रुपयांपर्यंत
घसरलेत. हा घाऊक बाजारातील दर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा लाल
चिखल होण्याची वेळ आलीये.
आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दर ढासळलेत, परिणामी कालच्या बाजारात अडीच ते दहा रुपये प्रति किलो असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दर हळूहळू पडू लागलेत. मुद्दल ही हातात येत नसल्यानं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय.