२७ ठेकेदारांना दिलें होतें यापुर्वी कंत्राट, माहिती अधिकारात उघड.
संगमनेर (प्नतिनिधी) निमोण तळेगाव ही दुष्काळी पंचक्रोशी नेहमीच पाण्यापासून वंचित राहिली शासनाची कुठलीही पाणी पुरवठा योजना आता पर्यंत येथे पोहचली नाही.उन्हाळा लागतात येथे पाण्याचे टँकर चालू होतात पण ते पाणी अल्प असल्याने येथे पाण्याच्या पाण्याची नेहमीचं टंचाई भासते शेतीला तर पावसाच्या पाण्याशिवाय पर्यायच नाही या पंचक्रोशीला वरदान ठरलेली भोजापूर पुरचारी ही जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्देश आमदार अमोल खताळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
संगमनेर तालुक्यातील सोनुशी येथील गिते वस्तीजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पुरचारीच्या कामाचा शुभारंभ नुकताच आ.अमोल खताळ यांच्या हस्ते झाला त्यावेळी बोलताना आ.खताळ म्हणाले की जलसंधारण आणि जलसंपदा या दोन्ही विभागाच्या गुंत्यामध्ये या तालुक्याच्या तत्कालीन लोकप्रतिनिधी मुळे तसेच नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी आपल्या हक्काचे पाणी सिन्नर तालुक्यात पळविले त्यामुळे खऱ्या अर्थाने तळेगाव भागातील शेतकरी ५० वर्षापासून पाण्या अभावी जीवन जगतोय
त्यामुळे त्यांची वाताहत झाली परंतु आज आपल्याला प्रत्यक्ष आपल्याल या भागामध्ये भोजापुरचे पाणी आणून दाखवायचे आहे.याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत बैठक झाली आहे ही पुर चारी जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे वर्ग केली आहे त्यामुळे आता या चारीचे काम थांबणार नाही तर अति जलद गतीने सुरू होणार असल्याचे आ.अमोल खताळ यांनी या भागातील शेतकऱ्यांना सांगितले
यावेळी जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी कपिल बिडगर सुरेश मंडलिक भोजापूर पुरचारी संघर्ष समितीचे प्रमुख किसन चत्तर भाजपाचे ज्येष्ठ नेते भिमराज चत्तर शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे बाप कंपनीचे रावसाहेब घुगे भाऊसाहेब घुगे भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सानप भाजप युवा नेते अमोल आभाळे डॉ.आर. पी.दिघे राजू जाणेकर सुनील दिघे शंकर चत्तर सोपान कांदळकर संपत फंड राजेंद्र आहेर अनिल बोऱ्हाडे काशीनाथ बोऱ्हाडे श्रीकांत सोनवणे अशोक गोडगे भाऊसाहेब सोनवणे प्रकाश सोनवणे यांच्यासह तळेगाव पंचक्रोशीतील अनेक शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
-प्रत्येक निवडणुकीत या चारीचा मुद्दा केंद्रस्थानी येत पण गेल्या चाळीस वर्षांपासून. राजकीय विळख्यात अडकलेली निमोण-तळेगाव भागाची ही पुरचारी फक्त कागदी घोडे नाचवित होती अनेक वेळा कोट्यावधी रुपये पाण्यात गेलेल्या या चारीला मात्र कधीच पाण्याचा थेंब देखील कधी आला नाही असा गंभीर आरोप या पुरचारी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केला.