नाशिक (दिनकर गायकवाड) नाशिक येथील नानावळी व वडाळातील मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होताना दिसतोय,स्वातंत्र्यानंतर ७६ उलटले तरी येथील मुस्लिमांना महानगरपालिकेची स्वतंत्र दफनभूमी नाही,शासन दरबारी याची चालढकल चालू आहे
याबाबत नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नामदार प्यारे खान यांची भेट घेतली.प्रसंगी नाशिक शहरातील महानगर पालिका संचालित उर्दू शाळांच्या सध्याच्या परिस्थिती बाबत आणि खालावत चाललेल्या दर्जा बद्दल त्यात रोडावत गेलेला हजेरी पट याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.तेव्हा नामदार खान यांनी समक्ष भेटीचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले.व सांगितले की येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून उर्दू माध्यमांच्या काही शाळा ह्या डिजिटल करुन सेमी इंग्लिश माध्यमाच्या करण्यात येतील त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून रखडलेल्या नानवली व वडाळा येथील दफनभूमीचा देखील प्रश्न लवकरच मार्गी लावू असेही त्यांनी सांगितले.