लोहगाव (प्नतिनिधी) राहाता तालुक्यातील लोहगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आणि जन्माचा सोहळा अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस मानला जातो.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना रयतेच्या सुखाची होती, शिवरायांनी समतामुलक समज निर्मिती केली होती श्री.चेचरे पुढे म्हणाले की शिवरायांची एकूण कार्यपद्धती रयत उद्धारासाठी होती अशी महाराजांची विविध कौशल्ये त्यांनी मांडले.शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून,त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली.त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने आज घेतला पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे.प्रा.किरण चेचरे.कृष्णा चेचरे.किशोर दंरंदले.अनिल चेचरेअक्षय चेचरे.सोसायटीचे सचिव आर.व्ही.चेचरे. गौरव राजेंद्र चेचरे, कुमार अशोक चेचरे,गणपत ज्ञानदेव शिंदे
आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.