संगमनेर (प्नतिनिधी) तालुक्यातील निळवंडे गावातील लोकांचे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न साकार झाले आहे.निमित्त आहे,की निळवंडे गावात नुकताच आठवड्यातील दर शुक्रवारी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत बाजार भरणार आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मा.खा.डॉ .सुजय विखे पाटील मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनातून तसेच जनसेवा कार्यालय संगमनेर आणि निळवंडे यांच्या सहकार्यातून निळवंडे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना हा बाजार महत्त्वाचा ठरणार आहे.
गावातील आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन गरजा आपापल्या गावातच भागवल्या जाव्यात, निळवंडे गावात दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तू भाजीपाला,जीवनावश्यक किराणा माल तसेच परिसरातील व्यवसायासाठी,शिक्षणासाठी आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू सर्व गावातच उपलब्ध होतील, त्यासाठी येथील ग्रामस्थांना दहा ते वीस किलोमीटरचा प्रवास करून खरेदीसाठी दुसरीकडे जावे लागू नये या उद्देशाने ग्रामपंचायत निळवंडे,सरपंच, उपसरपंच,सर्व सन्माननीय सदस्य,बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय आणि गावातील सर्व तरुण मंडळांच्या सहकार्याने आपण हा आठवडे बाजार सुरू झाला आहे.
हा बाजार सुरू करण्यामागे दुसरा आणखी महत्त्वाचा उद्देश असा की पंचक्रोशीत पिकणाऱ्या शेतीमालाला, निळवंडे येथे तयार होणाऱ्या उत्पादनांना गावातच बाजारपेठ मिळावी आणि जास्तीत जास्त माल उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत, शेतकऱ्यांपासून तर नागरिकांपर्यंत थेट पोहोचविला जावा,त्यामुळे विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांचाही फायदा होऊन गावातील आर्थिक व्यवस्थेला चालना मिळेल या प्रामाणिक उद्देशाने हा आठवडे बाजार आपण सुरू झाला आहे तरी निळवंडे आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या आठवडे बाजारचा लाभ घ्यावा व आपले जीवनमान सुधारण्यासाठी या बाजाराचा फायदा करून घ्यावा असे आवाहन येथील लोकनियुक्त सरपंच
सौ.शशिकला शिवाजी पवार,उपसरपंच भाऊसाहेब आहेर सर्व सदस्य शिवाजी बाबा आहेर,बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय निळवंडे यांच्या वतीने करण्यात आले.