हा गुढी पाडवा छत्रपती संभाजीराजेंच्या रक्ताचा सडा आहे.

Cityline Media
0
-"पाडवा आणि गुढीपाडवा"
-षंढासारखी घरावर आजही गुढी उभारली जाते.
-पडव्याचा गुढीची संबंध नाही.
 मनुस्मृतीची दहशत लाथाडून,बुद्धभुषणम् नावाच्या प्रसिद्ध संस्कृत ग्रंथासह नायिकाभेद,सातसतक, नखशिखा असे वैचारिक ग्रंथ ज्या राजाने लिहीले, त्या संभाजीराजेंची हत्या ब्राम्हणवाद्यांनी ज्या दिवशी केली तो दिवस म्हणजे ११ मार्च १६८९ म्हणजे तिथीनुसार आताचा फाल्गुन वद्य आमावस्या गुढीपाडव्याचा आदला दिवस होय.याची ऐतिहासिक सत्यता प्रबोधन व जनजागृतीच्या माध्यमातुन आज बहुजनांना समजत आहे.
ब्राम्हणवाद्यांची सर्वात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे बहुजनांमध्ये होत असलेली सामाजिक जागृती होय.कारण जन जागृती झाली तर ते फार काळ बहुजनांना मुर्ख बनवु शकत नाही याचे भान ब्राम्हणवाद्यांना आहे. त्यामुळे ज्या-ज्या गोष्टींबद्दल बहुजन समाजाचे विचार परीवर्तन, प्रबोधन,आकलन होत असते त्या त्या गोष्टींबद्दल अधिक दिशाभुल, विपर्यास करणारी, भ्रामक माहीती पसरविण्याचे कामही काही भटाळलेल्या व सामाजिक दृष्ट्या अडाणी असलेल्या बहुजनांच्या माध्यमातुन ते करीत असतात.

 छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीच्या नियमाखाली अंमल करुन ब्राम्हणवाद्यांनी केली व ती घटना पाडवाच्या दिवशी विजयी गुढी उभारुन ते साजरी करीत आल्याचे आता अगदीच स्पष्ट झाले आहे. या गोष्टीवर पांघरुन घालण्यासाठी गुढीपाडवा पुर्वीपासुनच कसा अस्तित्वात होता हे सिद्ध करुन दाखविण्यासाठी सोशल मिडीयावर ते थयथयाट करताना दिसत आहेत.

 त्यासाठी ते संत साहीत्यातील काही गाथांचा अर्थभेद करीत ओढुन ताणुन हवाला देत आहेत.खरे बघावे तर संत साहीत्य गाथांमधील 'गुढी' या शब्दाचा उल्लेख 🚩'झेंडा' या मुळ अर्थाने असल्याचे आपोआपच सिद्ध होते... संताची जी प्रबोधन क्रांतीची वारकरी चळवळ होती त्या चळवळीच्या प्रचार प्रसाराची धुरा..अर्थातच त्या चळवळीचा झेंडा हाती घ्यावा हाच साधा सरळ संदेश त्यांच्या अनेक वचनांतुन अगदी स्पष्टपणे दिसुन येतो. गुढी म्हणजे पताका किंवा झेंडा सातत्याने आपल्या हाती घ्या ('हाती घ्या' हा शब्द महत्वाचा) असे ते म्हणतात.. केवळ या चैत्र प्रतिपदा या दिवसापुरतीच घरावर उभारा असे ते कधीही म्हणत नाहीत.. तसा त्या गाथांचा अर्थ देखील होवु शकत नाही.आणि अशा विचित्र गुढीचे चित्रणही त्यातुन वर्णित होत नाही.

आज गुढीपाडव्याला घरावर ज्या प्रकारची उलटा गडवा(तांब्या)लिंबाचा पाला.. अशी अशुभ प्रकारची गुढी उभारली जाते तिच्याशी बहुजन संतांनी आपल्या गाथांमध्ये वर्णन केलेल्या या गुढीचा काडीमात्र संबंध नाही.घरावर उभारलेली उलट्या गडव्याची गुढी हे नि:संशय संभाजी महाराजांच्या 'गुढ' हत्येचेच प्रतिक आहे. गुढी म्हणुन काठीला चोळी कापड, गडवा तांब्या, लिंबाची पाने इत्यादी बांधने हे नेमके कशाचे प्रतिक आहे? त्यामागे काही उचित कारण तरी आहे का? याबाबत कुणीही योग्य विश्लेषण करु शकत नाही. कारण तिच्या काठावर भाल्याच्या टोकावर शंभुराजांच मस्तक अडकवून 'गुढी' उभारली गेली होती, शरीराचा सापळा टांगून त्या भोवती कडु लींबाची पानं बांधली होती, व ईथूनच ही भटविजयाची दळभद्री परंपरा आपल्या घराघरात घुसली ती कायमची !

    षंढासारखी घरावर 'गुढी' आजही आम्ही उभारतो व शंभु राजांच्या बलिदानाची टिंगल करतो. ब्राम्हणानीच संभाजीची मनुस्मृती नुसार हत्या घडवुन आणली हे ऐतिहासिक क्रुर सत्य कसे दडपुन ठेवता येइल व हे दडपुन ठेवन्यासाठीच गुढीपाडव्याची सुरुवात कशी झाली हे अनेक भटभाकड कथांमधुन पटवुन सांगताना ब्राम्हणवाद्यांची चांगलीच दमछाक झालेली दिसुन येते. गुढीपाडव्या बाबत ते कधी म्हणतात..

ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली तो आपला पहिला वर्षदिवस होय..किंवा इंद्राने याच पाडव्याच्या दिवशी दधिची ऋषींच्या अस्थींच्या योगे बनविलेल्या वज्राने वृत्रासुराचा वध केला किंवा रामायण काळात श्रीरामांनी आपल्या राज्यकारभाराला या शुभदिनी आरंभ केला तर कधी म्हणतात की हिंदु नववर्ष दिन..इत्यादी इत्यादी.

 परंतु सवाल हा की हिंदु धर्मच तेव्हा अस्तित्वात नव्हता तर हिंदु नववर्ष दिन साजरा होणारच कुठून? ते ही केवळ महाराष्ट्रातच. खरे तर देशात काही सण वेगवेगळ्या राज्यात विभिन्न रितीने साजरे केले जात असतीलही, पाडवा देखील वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने भारतीय नववर्षाची सुरुवात या ऐतिहासिक तथ्यावरच साजरा होत असल्याचे दिसून येईल, 

जसे बंगाल मध्ये 'नववर्ष', काश्‍मीर मध्ये 'नवरोज' कर्नाटक, आंध्र प्रदेशात 'उगादी', तामिळनाडूत 'पुथांडू', सिंध मध्ये 'चेटी चंडी', पंजाबमध्ये 'बैसाखी,' आसाम मध्ये "गोरी बिहू' अशा नावाने पाडवा या सनाला साजरे केले जाते, तरी पण गुढीपाडवा नावाचा व अशा प्रकारच्या गुढ्या घरावर लावण्याचा विचित्र प्रकार इतर राज्यात  साजरा करण्यात येत असल्याचा तरी कोणताही ठोस पुरावा अस्तित्वात नाही. 

खरे तर भारतीय नववर्षाची सुरुवात ज्या नावाने केली जात होती त्या दिवसाला पाडवा म्हणतात (गुढीपाडवा नाही) हे एक दुर्लक्षित झालेले ऐतिहासिक सत्य समजुन घेणे आवश्यक आहे. बारीक निरीक्षण केले तर आजही ग्रामीण बोलीभाषेत 'पाडवा' हाच शब्द जास्त प्रचलित असल्याचे दिसुन येइल, ज्याचा गुढीशी अजिबात संबंध नाही.

इतिहास तपासुन पहा या भारतीय नववर्षाची सुरुवात शालीवाहन शक या संवस्तर पासुनची आहे.शालीवाहन म्हणजेच सातवाहन आणि सातवाहन हे राजे बौद्ध होते व संपुर्ण दक्षिण भारतात सातवाहनांचे इस.पुर्व २रे ते इस.३रे शतक असे सर्वात दिर्घकाळ साम्राज्य होते. 

त्याच काळी उत्तर भारत, सिंध ते उत्तर महाराष्ट्र पर्यंत (सिथीयन) शकांचे साम्राज्य १ल्या शतकात स्थापन झाले, ज्याची राजधानी नाशक (नासिक) होती. तर सातवाहनांची राजधानी पैठण होती. शक सुद्धा नंतर बौद्ध झाले. त्यापुर्वी सातवाहनांशी त्यांचा संघर्ष चालला व पुढे तह होवुन ही दोन सहकारी बौद्ध साम्राज्य प्रतिष्ठित झाल्याचा प्रमाणित इतिहास आहे.

या सहकारी साम्राज्याचे नवे संयुक्त शक संवत्सर त्यांनी अंमलात आणले म्हणुनच त्यास शालीवाहन-शके असे संबोधले जाते.तत्कालिन बौद्धांचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या भगव्या रंगांचे धम्मध्वज उभारुन,पताका बांधून ज्याचा प्रारंभ दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.ज्या चैत्र शुद्ध प्रतिपादेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. 

त्यालाच प्रतिपदा अर्थात पाडवा (पाली भाषेत पटीपद) म्हणतात. (पडाव=पुढचा टप्पा किंवा पद, पाऊल तथा सुरुवात) इस.पहील्या शतकात हे शक केवळ भारतात लागु झाले असे नाही तर युरोप पर्यंत पोहचले, तिथे ते सौर मंडलावर विकसित केले गेले तर भारतातील शक संवत्सर हे चंद्रकलेवर आधारीत असल्याने कालांतराने त्यातील काही महीने आणि वर्षात काहीसे अंतर पडत गेले. कारण सौर मंडलावरील कॅलेन्डर ज्याला आज आपण इंग्रजी कॅलेंडर म्हणतो त्यात सुरुवातीला काही वर्षे जानेवारी व फेब्रुवारी हे दोन महिने नव्हते तर मार्च महिनाच वर्षाचा सुरुवातीचा महिना होता, म्हणून सौर मंडलावरील कॅलेंडर वर्ष मार्च महिन्यात व चंद्रकलेवरील कॅलेंडर वर्ष चैत्र महिन्यात असे दोन्हीही नववर्षे एकाच दरम्यान सुरु होत होते, अर्थात आजही मार्च महिन्यातच भारतीय चैत्र महिना येत असतो, 

जानेवारी फेब्रुवारी हे दोन महिने नंतर वाढल्याने कालांतराने या दोन्हीही कॅलेंडर मधील तफावत वाढली. आज या दोन्हीमध्ये साधारण: ८० वर्ष इतका फरक आढळुन येतो.युरोपमधुन तेच बौद्ध शक संवत त्याकाळी जगभर पसरले ज्याला आज जेग्रेरियन कॅलेंडर म्हटले जाते.

ब्रिटीश काळात हेच कॅलेंडर नव्याने भारताने स्विकारले, ते ब्रिटीशांकडून स्विकारल्याने त्यास आपण इंग्रजी कॅलेंडर म्हणतो.तात्पर्य हे की पाडव्याचा 'हिंदूनववर्ष' या धार्मिक संज्ञेशी काही संबंध नाही कारण त्याकाळात हिंदु नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता व आज ही नाही, त्याकाळात सर्व बहुजन लोक बौद्ध होते. म्हणुन पाडवा हा तत्कालीन बौद्धांचा नववर्ष दिन असल्याचे सिद्ध होते. ही बहुजन बौद्ध संस्कृतीची देण होती, मात्र कालांतराने ज्याचे ब्राम्हणीकरण करण्यात आले.

 ब्राम्हणवादी लोक खरा इतिहास लपविण्याचा नेहमीच उद्योग करतात, त्यातल्या त्यात बौद्ध बहुजनांचा इतिहास तर ते जमिनदोस्त करु पाहतात. आणि तसे शक्य नसेल होत तर त्यात मिलावट करुन त्याचे मुळ स्वरुप बिघडवुन टाकतात. याच बहुजनांच्या ऐतिहासिक मंगल दिनाचे ब्राम्हणीकरण करण्याचा डाव सतराव्या शतकात छत्रपती संभाजींची हत्या करुन ब्राम्हणवाद्यांनी साधला.

संभाजी राजांचा मृत्यूचा आदेश औरंगजेबाने जरी दिला होता तरी पण त्याच्या अंमलबजावणीचे काम ब्राम्हण मंत्र्यांकडून झाले म्हणून ब्राम्हणांनी मनुस्मृती नुसार डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जिभ कापणे या सारख्या अनेक भयंकर शिक्षा फर्मावल्या, अशा प्रकारच्या अतिरेकी शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे.

मुस्लीम धर्मात 'सरकलम' ही आज्ञा डायरेक्ट दिली जाते.रामदास भटाचा भटशिष्य रंगनाथ स्वामीने संभाजीराजेंना पकडून दिल्यानंतर तो औरंगजेबाला म्हणाला याने आमच्या धर्माशी द्रोह केला आहे.त्याने संस्कृत वाचले, संस्कृत लिहले आहे. त्यामुळे त्याला शिक्षाही वैदिक धर्मातील मनुस्मृतीप्रमाणेच देण्यात यावी.

औरंगजेबाच्या दरबारी त्यावेळी हजर असणारा त्याचा अखबारी खाफीखान, ईश्वरदास नागर, भिमसेन सक्सेना, यांनी हत्येसमयी रंगनाथ स्वामी उपस्थित असल्याची नोंद केली आहे. उपलब्ध पुराव्यांनुसार राजेंना पकडल्यानंतर ४० दिवसामध्ये महाराजांना ते कधीही ठार करु शकले असते.तत्कालिन बखरकार 'भिमसेन सक्सेना', 'ईश्वरदास नागर ' यांनी शंभुराजांच्या कैदेबाबत इतिहासात तारीखवार नोंद केेली आहे, त्यांच्या मते..

१ फेब्रुवारी १६८९ ला महाराज कैद झाले, तिथून त्यांची राजवस्त्र जिरेटोप काढून 'तख्ता कुलाह' म्हणजे विदूषकी कापड लाकडी टोपी चढविली गेली. कवी कलषा समवेत ६ दिवस त्यांची जाहीर धिंड काढल्या गेली,
७ फेब्रुवारीस रक्तबंबाळ शरीर, लोखंडी साखळदंडामध्ये कैद करुन वडू बुद्रुक व तुळापुर येथील संगमेश्वरावर औरंगजेबासमोर हजर केले गेले,
९ फेब्रुवारीस महाराजांचे डोळे मस्तकाच्या पात्रातुन तप्त सळयांनी वेगळे अलग केल्या गेले,
१२ फेब्रुवारीस लोखंडी सांडशीने जिभ उखडल्या गेली,
१३ तारखेस कानामध्ये तापलेले शिसं ओतल्या गेले,
नंतर हातापायाची नखं काढल्या गेली,
अंग तलवारीच्या टोकाने सोलल्या गेलं,
त्यावर गरम मिठाचं पाणि टाकून शरीराला यातना दिल्या गेल्या व गुडघ्याच्या कटोऱ्या काढून त्यांचे हातपाय तोडल्या गेले,
अशा अवस्थेतही शंभुराजे जिवंतच होते अशावेळी वाचकांच्या काळजात धस्स होते.
२० फेब्रुवारी ते ११ मार्च पर्यंन्त भटधर्माचे ठेकेदार का थांबून होते? त्याचा शिरच्छेद त्यांना २० फेब्रुवारी लाच करायला हवा होता; मात्र ते मुद्दाम थांबले... ११ मार्च च्या अमावस्येसाठीच ! रक्ताचा पाडवा साजरा करायला.
 
जो पाडव्याचा दिवस बहुजन समाज गेली १६०० वर्षे मंगल दिनाच्या रुपात साजरा करीत आले, तोच दिवस संभाजीचे शिर भाल्यावर ठेवुन मिरवण्यासाठी सतराव्या शतकात निवडला कारण तो पाडव्याचा दिवस ब्राम्हणांनाही एका गुढ प्रकारची विजयी गुढी उभारुन साजरा करता यावा व इतरांना आपला खरा आनंद कशात आहे हेच कळु नये.कालांतराने ह्याच पाडव्याला गुढी प्रथा बहुजनांवर नकळतपने लादली गेली.आणि पाडव्याचे रुपांतर सतराव्या शतकानंतर गुढीपाडव्यात कधी झाले हे गुढ बहुजन समाजाच्या लक्षातही आले नाही. यासारख्या असंख्य गुढ गोष्टी बहुजनांच्या लक्षात येवुच नयेत व आल्या तरी त्यांनी त्याची चिकित्सा करुच नये यासाठी ही मंडळी प्रसार माध्यमे.. मिडीयातुन टिव्ही सिरीयल मधुन जो सण असेल त्याचे नकली महत्व अतिरंजितपणे लोकांवर थोपविण्याचा अतिरेक करताना दिसतात.

ब्राम्हणवाद नेहमीच त्यांचे ऐतिहासिक गुन्हे लपविण्यासाठी लबाडी करीत आलेला आहे, जुन्या शब्दांचा व घटनांचा मुळ अर्थ बदलुन त्यांचा अनैतिक वापर करण्यात ब्राम्हण खुप तरबेज असतात हे बहुजनांनी लक्षात घ्यावे.

उदा. २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी षडयंत्र पुर्वक आतंकवादी हमला घडवुन तो २६/११ काळा दिन घोषीत करने...
६ डिसेंबर ला डॉ.आंबेडकर महापरीनिर्वाण दिनाच्या तारखेलाच बाबरी मस्जिद पाडून तो दिवस जाणिवपुर्वक हिंदूविजय दिन घोषीत करणे...
अशोक विजयादशमी ला दसरा/दशहरा म्हणने...
 
तसेच शब्दांच्या बाबतीतही... उदा. निर्वाणचा जुना अर्थ मुक्ती असा होता.. ते आज हा शब्द मृत्यू किंवा शेवट या अर्थाने वापरतात. तसेच शिव म्हणजे कल्याण. गणपती म्हणजे गणराज्याचा प्रमुख. आस्तिक म्हणजे अस्तित्वात असलेल्या सत्य गोष्टीवर विश्वास ठेवणारा. दर्शन म्हणजे तत्वज्ञान, विचारधारा..इत्यादी. हे मुळ अर्थ होते, परंतु आज तेच शब्द कोणत्या अर्थाने वापरात आहेत हे आपण सर्वच जाणतो.हे असे असंख्य शब्दांचे मुळ अर्थ वेगळेच होते परंतु त्यांचा वापरही ब्राम्हणी साहित्यातुन त्यांच्या सोईचा केलेला दिसतो. अशी प्रत्येक गोष्ट ब्राम्हणवादाला अनुकुल करुन घेणे यालाच ब्राम्हणीकरण म्हणतात. 

तात्पर्य हे पाडवा हा बौद्ध बहुजनांचा नववर्ष प्रारंभ सण भारतात साजरा केला जात होता, बहुजनांच्या याच मंगलदिनी, संभाजी राज्यांचे शिर भाल्यावर अडकवुन पाडव्याचे सतराव्या शतकात महाराष्ट्रात ब्राम्हणीकरण करण्यात आले.पाडवा जरुर बहुजनांचा सण आहे परंतु गुढीपाडवा हे पाडव्याचे ब्राम्हणीकरण आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. 

काही ब्राम्हणवादी लेखक संभाजी राजांच्या काळाच्या आधीही गुढी उभारली जात होती हे सिद्ध करण्यासाठी संत साहित्यातील किंवा अन्य काही तथ्यहीन संदर्भ देऊन खऱ्या इतिहासावर पडदा टाकण्यासाठी आटापिटा करताना दिसत असले तरी, जुन्या संदर्भात गुढीचा अर्थ ध्वज किंवा झेंडा व पताका असे असल्याचेच सिद्ध होते, सध्या घरावर उभारल्या जाणाऱ्या एकदिवसीय गुढीशी त्याचा काडीमात्र संदर्भ जुळत नाही.

म्हणुनच सत्य इतिहास समजुन घेऊन बहुजन समाजाचे प्रबोधन करण्यासाठी इतिहासातील ब्राम्हणीकरणाचे अब्राम्हणीकरण करणे ही जागृत बहुजनांचीच मोठी जबाबदारी ठरते ब्राम्हणवादी त्यांचे त्यांचे काम करतच राहतील, बहुजन महापुरूषांची हत्या त्यांच्यासाठी आनंदाची बाब असु शकेल. त्याचा ते रेटुन प्रचार करतीलच.

बपरंतु आपल्या थोर राज्याची विटंबना किंवा टिंगल आपण गडवा-गुढीच्या प्रतिकेतून अथवा गुढी घरावर उभारुण करणे कितपत योग्य आहे याचा विचार सुज्ञ बहुजन समाजाने अवश्य करावा. मात्र गुढी ऐवजी घराघरांवर या दिनी भगवे ध्वज उभारून भारतीय नववर्षारंभ दिनाला ऐतिहासिक उजाळा देत असू व त्याच सोबत संभाजी राजेंच्या बलिदानाला स्मृतीमय सलामी देत असू तर याला किमान मराठी बहुजनांच्या वैचारिक क्रांतीचे एक पाऊल पडती पुढे असे जरूर म्हणता येईल.
हर्षद रुपवते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!