प्रवरेच्या पाण्यातून आश्वीच्या बंधाऱ्यामुळे परिसराचे नंदनवन-रामभाऊ भुसाळ

Cityline Media
0
आश्वी (संजय गायकवाड ) लोकनेते स्व.बाळासाहेब विखे पा.यांच्या संकल्पनेतुन चाळीस वर्षांपूर्वी आश्वी येथील प्रवरा नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर रचनेच्या बंधाऱ्यांमुळे या परिसराचे नंदनवन झाल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ यांनी नुकतेच केले.
आश्वी खुर्द येथील कोल्हापुर रचनेच्या बंधाऱ्यावर जलसंपदा विभागामार्फत जलपुजन अहिल्यानगर भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा सौ.कांचन मांढरे राजेंद्र मांढरे व भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस व पदवीधर मतदार संघ संपर्क प्रमुख अशोक जऱ्हाड सौ.लता जऱ्हाड या दोन दामपंत्यांच्या  हस्ते करण्यात आले.याप्रसंगी जलसंपदा विभागाचे कालवा निरीक्षक सुषमा वाईगडे, मोजणीदार दिपाली सव्वासे,रामभाऊ भुसाळ, संचालक डॉ. दिनकर गायकवाड, विजय चतुरे, अशोक म्हसे,अजय ब्राम्हणे, सरुनाथ उंबरकर,अँड. रोहीणी निघुते, माधवराव गायकवाड,भाऊसाहेब जऱ्हाड, कारभारी म्हसे,शाळीग्राम चंद,शिबलापुरचे सरपंच दिलीप मुन्तोडे,भारत गिते, लक्ष्मण आंधळे,ज्ञानेश्वर वाकचौरे, मोहीत गायकवाड, विलास कदम आण्णासाहेब जऱ्हाड, मच्छिंद्र गायकवाड, विनायक जऱ्हाड,आश्वी खुर्दच्या सरपंच अलका गायकवाड, उपसरपंच बाबा भवर आदि उपस्थित होते.
 
प्रसंगी रामभाऊ भुसाळ पुढे म्हणाले की, या कोल्हापूर रचनेच्या बंधाऱ्यामुळे परिसरातील आश्वी बुद्रुक,आश्वी खुर्द,उंबरी बाळापुर परीसराचे नंदनवन झाले असून राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे या परीसरातील विकास कामावर बारीक लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.प्रवरा नदी पात्रावर आश्वी ते कोल्हार पर्यंत जवळपास ६ ते ७ बंधारे बांधले गेले.यामुळे या गावातील लाखो हेक्टर जमीन ओलीता खाली आली. बंधाऱ्यामुळे नदीपात्रात बारा महिने पाणी राहाते असे अंतिमतःभुसाळ म्हणाले


 कृषीन्नोती आश्वीच्या विकासाचे चक्र नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्यामुळे गतीमान
 ■ जलसंपदा मंत्री  तथा पालक  मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे आश्वी जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामांना गती मिळाली असुन अनेक वर्षापासुन बंद असलेल्या चारी पुन्हा खोदून त्यामध्ये पाटाचे पाणी सोडण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचले.त्यामुळे परीसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सरूनाथ उंबरकर यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!