अत्यंत दुःखद मन हेलावून टाकणारी,प्रत्येकाच्या मनाला धस्स करणारी,मेंदू सुन्न करणारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची घटना असुन मारेकऱ्यांना तर कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षा झालीच पाहिजे असा सर्वसामान्यांचा होरा होताना दिसतोय.परंतू,या मारेकऱ्यांचे जे कोणी आका असतील,गॉड फादर असतील त्यांनाही शिक्षा होने अत्यंत गरजेचे आहे आणि हा बेबंद मस्तवालपणा कायद्याने उखडून काढला पाहिजे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणाची पुनरावृत्ती मी व माझे कुटुंबासोबत होता होता जरी राहिली असली,तरी, आमच्या मातोश्री चांगुणाबाई मात्र त्या घटनेच्या धक्क्याने दगावल्या याचे दुःख मनाला खूप वेदना देत आहेत ती सल सतत बोचत राहते.राहुरी पोलिसांच्या आशीर्वादाने आजही देवळाली प्रवरा मध्ये बालिश पुढाऱ्यांची प्रती कराड गँग उजळ माथ्याने गावात घिरट्या घालत आहे हे या गावाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
पहाटे ०१.४२ च्या दरम्यान गावातीलच या बालीश पुढाऱ्यांनी पोसलेले दरोडेखोर आणि दहशतवादी प्रवृत्तीच्या काही तरुणांनी माझ्या घराचे अंगणात घुसून विस्फोटाच्या साहाय्याने जनावरांचा चारा वैरण पेटवून मला व माझ्या कुटुंबाला जाळुन मारण्याचा प्रयत्न केला,त्याचे सी सी टीव्ही फुटेज उपलब्ध आहेत तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी या घटनेतील चार आरोपींचे सिडीआर काढले आहेत त्यांना चौकशी साठी नोटिसा सुद्धा काढल्या गाडीतील केवळ एका आरोपीचा तपास बाकी होता मात्र तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक फडोळ यांनी माझ्या समोर फाईलिंचा गठ्ठा आपटून "आम्हाला इतकेच काम आहे का?" असे संबोधून व चक्क खोटा साक्षीदार उभा करून आणि कागदी घोडे नाचवून या घटनेचा तपास जाणून बुजून थांबविला तो कोणाच्या आशीर्वादाने तेंव्हाच माझ्या देवळाली प्रवरा गावचा परळीच्या दिशेने प्रवास सुरू झाला असे म्हणता येण्याला वाव आहे.मात्र आम्ही देवळालीची परळी होऊ देणार नाही असले पोलीस अधिकारीच घटनेतील पुराव्यांना बगल देऊन या लोकांना सहकार्य करून पोसतात आणि तडजोडी करतात कायद्याचे रक्षकच भक्षक होतात.नंतर आपण परळी सारख्या घटनांवर शोक व्यक्त करत बसतो
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कोविड सेंटर इमारतीमध्ये झालेली चोरी,देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुळा धरण ते देवळाली प्रवरा पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन फोडण्याची घटना देवळाली प्रवरा सोसायटीच्या डिझेल पंप मधून डिझेल चोरीची घडलेली घटना या सर्व बाबी पोलिसांनी वेळीच उघडकीस आणल्या असत्या तर कदाचित माझ्या घरावर मध्यरात्री भ्याड हल्ला करण्याची हिम्मत या लोकांना झाली नसती पोलीस यंत्रणेकडून राजकीय दबावापोटी असल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही ही भावना या लोकांमध्ये बळावत जाते आणि मग मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारखी मोठी घटना घडते.
भविष्यात माझ्या गावातील कोणावरही ही वेळ येवू नये म्हणुन या आरोपींना आणि त्यांच्या आकांना वेळीच पायबंद घालण्यासाठी शेवटी आम्ही न्यायालयाचा आधार घेतला.राहुरीच्या न्यायालयाने तिन महिन्यात तपास पुर्ण करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे,त्यामुळे आता राहुरी पोलीस माझ्या घरी मध्यरात्री घडलेल्या त्या घटनेत उपस्थित लोकांचा मोबाइल सिडिआर रिपोर्ट,माझ्या घराचा सीसी टिव्ही फुटेज,खोटा साक्षीदार,घटनेच्या प्रसंगी थेट पूणे येथुन फोनवर मार्गदर्शन करणारा आका,गॉडफादर घटनेत वापरलेली चार चाकी गाडी या सर्व बाबींचा सखोल तपास करुण न्यायालयात कसा अहवाल सादर करतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे,असो.
सांगण्याचे तात्पर्य हे की,गाव कोणतेही असो बालिश नेत्यांना आणि गावगुंडांना सर्वांनी मिळून वेळीच आवर घाला नाहीतर प्रत्येक गावात अनागोंदी भाजुन संतोष देशमुख हत्या प्रकरणांची पुनरावृत्ती होतच राहील.!
शेवटी परळी ते देवळाली सर्वांचे दुःख सारखेच.!
शब्दांकन
आप्पासाहेब भिमराज ढूस
शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू.
मु.देवळाली प्रवरा ता.राहुरी, जि.अहिल्यानगर
मो.9823035936