प्रहार जनशक्ती पक्षाचे यश
नाशिक (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहूरीच्या शिवाजीनगर येथील डॉ.बा.बा.तनपुरे सह साखर कारखान्याच्या राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या गैर कारभाराची चौकशी करून यूनियनचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी राहुरी फॅक्टरी येथील साखर कामगार एकीकरण समितीच्या वतीने चंद्रकांत कराळे,इंद्रभान पेरणे,रफिक सय्यद,प्रहारचे आप्पासाहेब ढूस आदींनी नुकतीच केली होती.
या मागणीनुसार नाशिक येथील कामगार उपायुक्तांनी श्रमिक संघ अधिनियम १९२६ मधील तरतुदीनुसार युनियनला कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसात उत्तर दिले नाही तर युनियनचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात येईल अशा पद्धतीचे आदेश दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये चांगलीच धांदल आणि खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की,डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या मार्फत सदर साखर कारखान्याचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडविले जात नाही,कामगार हिताचे निर्णय घेत नाही.तसेच कामगार युनियन ॲक्ट १९२६ दिलेल्या नियमानुसार अस्तित्वात असलेली युनियन ही घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करित असून कोणतेही व्यवहार नियमाप्रमाणे करत नाही.त्याचप्रमाणे नियमानुसार असलेली २००१ ते २००५ कालावधी करिताची युनियन बरखास्त दाखवून बेकायदेशीरपणे नवीन सदस्य निवड दाखवून युनियनचा ताबा घेण्यात आलेला आहे.
हे सर्व कामकाज बेकायदेशीर असल्यामुळे कामगार एकीकरण समिती मार्फत दीड महिन्या पूर्वी बेकायदेशीर असलेल्या युनियनवर कायदेशीर कार्यवाही करून तिला बरखास्त करण्यात यावी,त्याच प्रमाणे येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी साखर कारखाना एकीकरण समिती मार्फत प्रयत्न व्हावेत असे ठरविण्यात आले.त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष यांचे माध्यमातून आप्पासाहेब ढूस अध्यक्ष श्रीरामपूर मतदार संघ. यांची मदत घेण्यात यावी असे ठरले.सदर कामाकरिता आप्पासाहेब ढूस यांनी कामगारांच्या लढ्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन युनियनचा बेकायदेशीर कारभार पाहता,सदर युनियन मधील सदस्य इंद्रभान पेरणे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला. ही सर्व वस्तुस्थिती पाहता साखर कारखाना एकीकरण समितीने कामगार आयुक्त नाशिक यांचे कडे तक्रार दाखल केली.सदर कार्यालयाने परिस्थितीची जाणीव लक्षात ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार कामगार आयुक्त यांनी, सदर तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन अस्तित्वात असलेला युनियनच्या गैरव्यवहार व गैरकारभार पहाता त्यांना चौकशीची नोटीस देऊन कायदेशीर कारवाही सुरू करण्यात आलेली आहे.
जिल्हा बँकेने सुद्धा याचे गांभीर्य ओळखून सदर युनियन बाबत तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे कामगारांमध्ये एकच खळबळ आहे.साखर कामगार एकीकरण समिती मार्फत चौकशीअंती युनियनकडून गैरकारभाराच्या संपूर्ण रकमा वसूल करण्याची मागणी लावून धरली जाणार असल्याचे साखर कामगार एकीकरण समितीचे प्रमुख चंद्रकांत कराळे, रफिक सय्यद, व इंद्रभान पेरणे,आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले त्यामुळे कामगारांना न्याय मिळण्याच्या अशा पल्लवी झाले आहेत.