पोटचे दोन मुले केले धम्मदान
जिथे देव नसतो तिथे आई असते.मात्र देव धर्माच्या गुरफाड्यात न अडकता तथागत भगवान गौतम बुद्धांची आदर्श जीवन प्रणाली मानवाला मानसिक दृष्ट्या स्वंतत्र बनविते आणि तेथुनच खऱ्या अर्थाने माणूस हा माणूस म्हणुनच मुख्य प्रवाहात येतो.
समाजातील अनेक धम्म सेवकांच्या साथीने अहमदनगर जिल्ह्यात धम्मचक्र गतीमान करण्यासाठी मी कोंची मांची जवळ नालंदा बौध्द आश्रमाची निर्मिती केली.आईने राहाता येथील मोठा भते महामोगलायन छोटा मुलगा
भंते करूणा बोधी थेरो यांना धम्मदान दिले आहे.
मी शासकिय सेवा सोडून धम्म कार्यात उतरलो या नालंदाची ख्याती चाळीस क्रोशीसह इतर जिल्ह्यात देखील होऊ लागली होती अनेक मोठ मोठे दिग्गज या आश्रमाला भेट घेऊन गेले,आजही देत आहे. परंतु कोरोना काळात संगमनेरात अचानक उगवलेल्या एका स्वयंघोषित नेत्याने आमच्यावर बेताल आणि बेछूट आरोप करत या धम्मचक्राच्या गतीला ख्वाडा घातला.माझी काहीही चुकी नसताना केवळ स्टंटबाजी करण्यासाठी हा आश्रम तोडला.
आपलेच लोक असं वागतील हे स्वप्नातही वाटल नव्हत,
आश्रमातील गॅस स्वंयपाकाचे सामान फेकुन दिले कमेरे तोडले व कमेरे तोडताना खाली ठेवलेला शिवाजी महाराजाचा पुतळा होता तो यावेळी फुटला व त्यातून खोटी केस माझा लहान मुलगा अभिजीतवर एका मार्तडाने केली,दहावीची परिक्षा झाल्यानंतर अभिजित व माताजी रस्ता अपघातात मरण पावले,
माझ्यावर देखील आदिवासी महिलेचा व आदिवासी माणसाचा जंगलात खुन केल्याची खोटी फिर्याद गावकऱ्यांनी लोकांच्या संगमताने माझ्यावर केली,त्यावेळी माझी खुप दयनीय स्थिती झाली होती.आता त्या धक्क्यातून सावरत आहे.
माझी आई कोंचीच्या घरात एकटी रहात होती चार चार दिवस माझी आई उपाशीच झोपली,जनता भेटायला यायची माझी आया,बायांच्या गळ्यात पडुन रडायची,माझी मोठी बहीण आईला भेटायला यायची ती माझ्या बहीणीला माझ्याबद्दल विचारायची भाऊ कसा आहे?व खुप रडायची बहीण म्हणायची चल नगरला!
आई म्हणायची "नको भाऊचे सामान लोक घरात घुसून घेवुन जातील.पर्यायाने माझी आई
उपाशी झोपली पण कोंचीचे घर तिने सोडलं नाही अखेरचा श्वास घेईपर्यंत.
मला मानणारे लोक लपुन यायचे व आईला भेटायचे,पैसे द्यायचे आई म्हणायची या पैश्याचं मी काय करू इथ सगळा अंधार आहे..सर्व संपलं आता.
मला कोर्टात जामीन मिळविण्यासाठी वकीलाला पैसे कमी पडले,तेव्हा आईने दारासमोरच झाड सात हजाराला विकल त्यातही गावच्या प्रकाश भोसले नामक गावगुडांने झाडात खोटा हिस्सा मागुन आईकडून दोन हजार रूपये बळकावले.
आईने मला कोर्टासाठी बहीणीजवळ पाच हजार रुपये पाठवले,माझा मुलगा अभिजीतमध्ये माझ्या आईचा खुप जीव अडकत होता.
अभिजीत अपघातात मरण पावला ही बातमी आईला समजली आणि माझ्या आईने अन्नपाण्याचा त्याग केला त्यातच अभिजीत व माताजीनंतर माझ्या आईने चौदाव्या दिवशी जीव सोडला,आज दोन वर्ष झाली या घटनेला अचानक तिची आठवण आली,आठवण आल्यावर मनात पुन्हा काहूर उठलं पण सन्यांशाने हे दुःख टाळायचं असतं म्हणून मी ते गिळून घेतले.
कोंची मांचीचा नालंदा आश्रम पुन्हा सुरू झाला पण समाजातील काही लोकांनी दिलेला अमानुष त्रास,वागणुक आजही आठवते,कोरोना काळात संगमनेरात उगवलेले स्वयंघोषित नेतृत्व आजही ठरतेय कार्यकर्त्य,नेत्यांची डोकेदुखी.
माझा अभिजीत झोपेतही हसताना मी पाहिला आणि मेल्यानंतरही मला हसताना दिसतो व माझी उर्जा वाढवतो,
जाड मुलगा दिसला की त्याच्यामध्ये माझा लाडका गोलु,अंगुलीमाल ,
अभिजीत,शोधतो,आणि अशा आईच्या पोटी मला पुन्हा जन्म मिळो,व या जन्म भंते झाल्यामुळे राहीलेली सेवा करण्याचे पुण्य पुन्हा एकदा मिळो,हिच तथागतासमोर याचना करतो, कारण आता रडत्याशिवाय पर्याय नाही,आईच्या आठवणी डोळ्यातील पाण्यात सदैव जीवंत राहातील,बुध्दाच्या चार आर्य सत्य शिवाय दुःख मुक्ती नाही,संघर्षमय जीवनास कोटी कोटी.प्रणाम,मंगल हो.सुखी हो.. कल्याण हो... तथास्तु!
मला आधार देण्यासाठी फोन करा,
-भंते करूणा बोधी
9637056807
नालंदा आश्रम कोंची मांची ता.संगमनेर