वैश्विक नाटकाचे अंतिम क्षण

Cityline Media
0

पृथ्वी ग्रहावरील आपण सर्व आत्मे एकत्र येऊन "वैश्विक नाटकात" 
अभिनय करीत आहोत. 

ज्यामध्ये चार टप्पे आहेत.
 सतयुग किंवा सुवर्णयुग,
 त्रेतायुग किंवा रौप्ययुग,
 द्वापरयुग किंवा ताम्रयुग,
 कलियुग किंवा लोहयुग. 

आत्मे शाश्वत असल्याने,हे नाटकही शाश्वत आहे त्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत राहते आणि आत्मे अनेक जन्म घेऊन नाटकात आपापल्या भूमिका बजावत असतात.

जागतिक नाटकातील सर्वात सुंदर भूमिका देव कलियुगाच्या शेवटी साकारत आहे. 

तो तोच आहे जो कलियुगाचे
  रूपांतर सुवर्णयुगात करत आहे आणि सर्व आत्म्यांना आणि निसर्गाला पुन्हा सकारात्मक आणि शुद्ध आध्यात्मिक उर्जेने भरत आहे. 

आता हे नाटक एका नवीन टप्प्यावर नव्याने सुरू होत आहे. सध्या आपण अशा स्थितीत आहोत, जेव्हा देव जागतिक नाटकात सुवर्णयुगासाठी आपली प्रत्येकाची भूमिका निश्चित करीत आहे.

हे चार टप्प्यांच्या नाटकातील
 अंतिम क्षण आहेत.

आपण देवाकडून शिकलो आहोत की पहिल्या दोन टप्प्यांमध्ये (सत्ययुग आणि त्रेतायुग) आपल्या संस्कारांमध्ये,आपल्या आरोग्यात, संपत्तीत, आपल्या नातेसंबंधांमध्ये आणि भूमिकांमध्ये सर्व काही चांगले होते. 

नंतर पुढील दोन टप्प्यांमध्ये (द्वापारयुग आणि सध्याचे कलियुग ) आपले अध:पतन झाले आहे. कारण या काळात आपण शारीरिक आकर्षणे आणि शारीरिक आसक्तींच्या प्रभावाखाली आलो आहोत.

आपण पुन्हा त्याच त्या चुका न करता केवळ सुंदर आणि सकारात्मक कृती करू या. आपण देवाचे आध्यात्मिक ज्ञान ऐकू  आणि तो काय म्हणतो त्याचा अनुभव घेऊ या. 

आपण देवाचा "प्रकाशाचे सर्वोच्च अस्तित्व" म्हणून अनुभव घेऊ या आणि सर्व आत्म्यांचे शाश्वत घर असलेल्या शांततेच्या आध्यात्मिक जगात - आत्म्याच्या जगात म्हणजे ध्यानात त्याच्याशी जोडले जाऊ या.

जागतिक नाट्यातील एका
 प्रवासाचा हा शेवट आहे .
आता आपण पुढील प्रवास सुरू करणार आहोत. ज्यामध्ये आपल्याला सुवर्णयुगासाठी सर्व गुणांनी, शक्तींनी आणि सुंदर संस्कारांनी परिपूर्ण आत्म्यांची आवश्यकता आहे. 

आपण सतत देवाच्या सहवासात राहून येणाऱ्या सुवर्णयुगात महत्वाची भुमिका साकारण्यासाठी सज्ज होऊ या. त्यासाठी आपणास मन:पुर्वक शुभेच्छा !!
विनायक देशमुख
अहिल्यानगर 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!