जो पर्यंत सर्व फेरीवाल्यांना न्याय मिळणार नाही तो पर्यंत संघर्ष चालू राहणार-दिपक भालेराव
ठाणे (सिटीलाईन मिडिया नेटवर्क)
ठाणे महानगरपालिका मध्ये गेल्या अनेक वर्षापासून फेरीवाल्यांचा प्रश्न हा प्रलंबित होता, त्या साठी फेरीवाला उपजीविका २०१४ कायदा लागू करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत असे धडाकेबाज युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल केंद्रे विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पथारी हातगाडी असोसिएशनचे सचिव दिपक भालेराव दोस्तांना ग्रुपचे राजू गुप्ता यांनी सांगितले.
फेरीवाल्यांना न्याय मिळण्यासाठी फेरीवाला कायदा प्रभावी अंमलात आणण्यासाठी १९ मार्च २०२५ रोजी फेरीवाल्यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी दिवा प्रभाग समितीच्या वतीने त्यांना पत्र मिळाले ,वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमचे म्हणणे पाठवणार आहोत असे लिखित आश्वासन त्यांना मिळाले होते,त्या वेळी दिवा प्रभाग समितीला त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ठाणे महानगरपालिका मुख्यालय कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी पत्रान्वये दिला होता.
याच अनुषंगाने दिनांक २४ मार्च २०२५ रोजी अमोल केंद्रे, दीपक भालेराव ,अभ्यालाल दुबे ,अनिल मौर्या,अरविंद कोठारी यांनी ठाणे महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन ,चर्चा करून फेरीवाला कायद्याच्या कलम ३ (३) नुसार जो पर्यंत सर्वेक्षण आणि लायसन्स मिळत नाही तो पर्यंत दिवा आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही फेरीवाले वर कारवाई करू नये व इतर महत्त्वाची मुद्दे लिखित मध्ये निवेदन दिले होते त्यानुसार दुसऱ्याच दिवशी दि.२५ मार्चं २०२५ रोजी ठाणे महानगरपालिकाने फेरीवाल्यांच्या निवडणुका जाहीर केल्या.
नियमाच्या कलम १५ अंतर्गत निश्चित केलेल्या तारीख तीन महिन्यापूर्वी ,नोंदणीकृत पथविक्रेता (फेरीवाले ) यांची मतदार यादी प्रसिद्ध करील अशी फेरीवाला नियम २०१६ नियम कलम १५ मध्ये तरतूद असताना दि. २५ मार्च २०२५ ला निवडणूकची घोषणा आणि ११ एप्रिल २०२५ रोजी मतदान येथे फक्त १७ दिवसाचा कालावधी दिला. तीन महिन्याचा कालावधी दिल्या नसल्याने ही फेरीवाला सदस्य निवडणूक नियमाला धरून नाही.
२०१९ आणि २०१६ मध्ये फेरीवाला सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने ठाणे महानगर पालिकेने केला आपण आकडेवारी पहिल्याने स्पष्ट दिसते.६००० फेरीवाल्यांचा सर्वे झाला,मोठया संख्येने फेरीवाले असताना सर्वेक्षण मध्ये फेरीवाले कमी संख्या का? ६००० सर्वेक्षण / झालेले फेरीवाले त्यातील १६३६ फेरीवाल्यांना पात्र /अधिकृत ठाणे महानगरपालिका ने ठरवून यादी प्रसिद्ध केली , ४६३५ सर्वेक्षण झालेले फेरीवाले यांना मतदार यादतून वगळण्यात आले हा नोंदणीकृत फेरीवाले यांच्यावर अन्याय आहे,
नोंदणीकृत फेरीवाल्यांना मताचा अधिकार मिळावा. सर्व नोंदणीकृत फेरीवाल्यांना कायद्याने मतदान करता यावे अशी मागणी करण्यात आली. फेरीवाला कायदा २०१४ च्या कलम २२ नुसार दिवा आणि मुंब्रा येथे विभाग पातळीवर स्पेशल टि. व्ही .एस. कमिटी स्थापन करावी आणि ठाणे महानगर पालिकेत मुख्य टि.व्ही.एस. कमिटी म्हणजे एकूण तीन टि.व्ही.एसच्या निवडणुका घ्यावे नंतर निवडून आलेल्या टि.व्ही.एस. च्या माध्यमातून उवरीत फेरीवाल्यांचा सर्वेक्षण तात्काळ करावा.सध्या स्थितीत सर्व फेरीवाल्यांचा जो पर्यंत सर्वे होत नाही,जो पर्यंत परवाने मिळत नाही तो पर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये.त्यांना व्यवसाय करू द्यावा.तसेच स्वच्छतेच्या नावाने ३० रुपये पावती देण बंद करून जे हफ्ते घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ही फेरीवाला निवडणूक रद्द करून फेरीवाला निवडणूक पुढे फेरीवाला कायदा आणि नियम ला धरून घेण्यात यावी. फेरीवाल्यांना फेरीवाला उपजीविका कायदा २०१४ प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि फेरीवाल्यांच्या ज्वलंत समस्या वर दि. २ एप्रिल २०२५ रोजी ठाणे महानगर पालिका कार्यालय समोर सकाळी १० वाजता ठिय्या/धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.सदर आंदोलनात ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान उपरोक्त पदाधिकाऱ्यांनी केले.