कोणत्याही धर्माचा सदस्य गुलाम नसतो.दुसर्या धर्मातील लोकांना गुलाम केले जाते.त्यामुळे हिंदू धर्मात जितकेही शूद्र आहेत ते मूळचे बौध्द आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना तोंडावर तुम्ही शूद्र (गुलाम) आहात असे सांगण्यास ब्राह्मण कचरले नाहीत!
Grok AI’ ही उत्तर देईल की महाबोधी महाविहार बौध्दांचे आहे !
बिहार (विहार) राज्याच्या बुध्दगयातील सम्राट अशोक राजा स्थापित महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेले एकशे एकतीस वर्षाहून अधिक काळ महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात मिळावे यासाठी संघर्ष सुरू आहे.
गेल्या महिन्यापासून बौध्द भिक्खूंनी आरपारची लढाई सुरू केली आहे. बिहार व केंद्रात ब्राम्हणी धर्माचा पुरस्कार करणार्या भारतीय जनता पक्षा (भाजप)ची सत्ता आहे.
भाजपला भारताला ब्राम्हणी राष्ट्र करायचे आहे. तसा अजेंडा भाजपची स्थापना करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (आरएसएस) चा आहे. तो लपून राहिलेला नाही.
त्यामुळे केंद्र व बिहारमधील भाजप सरकार महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देईल असे वाटत नाही. तसेच महाबोधी महाविहारातील दानावर आजवर जगणारे पंडे ब्रम्हवृंध महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यास राजी होतील अशीही सद्य शक्यता नाही. हे लक्षात घेता बौध्दांनी शांत राहून चालणार नाही.
सत्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर पण महाबोधी महाविहार ताब्यात घेण्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे.
भारतातील कोणता धर्म जगात लोकप्रिय?-
भारतामध्ये आजवर सुमारे १४ धर्म असल्याचे सांगितले जाते.त्याचबरोबर पंथांचीही गणती मोठी आहे.
धर्माचा विचार केला तर जैन, बौध्द, वैदिक सनातन (ब्राम्हणी धर्म), शीख, लिंगायत, आर्य समाज धर्म, सार्वजनिक सत्यशोधक धर्म, बहाई विश्व धर्म, वाल्मिक विश्व धर्म, फारशी, यहुदी (ज्यू), शिंतो, मुस्लीम, ख्रिश्चन इ. धर्माचा समावेश होतो. यातील बहुतांशी धर्म तसेच पंथ ब्राम्हणी धर्माने गिळकृंत केले आहेत.
अगदी सर्वात जुना धर्म म्हणून ज्या धर्माचा उल्लेख केला जातो त्या जैन धर्मावरही ब्राम्हणी धर्माने वर्चस्व मिळवले आहे.विज्ञानावर आधारलेल्या जैन धर्मातही आज काल देव, ज्योतिष, भूत पिशाश्च, कर्मकांड पहावयास मिळत आहे. एकप्रकारे त्या धर्मांची वैज्ञानिक संस्कृतीच खत्म केली आहे.ब्राम्हणी धर्माने ज्या धर्मांना संपवले आहे, त्या धर्माचे अस्तित्व भारत व भारतातील काही भागापुरतेच मर्यादित राहिले.अगदी ब्राम्हणी धर्म देखील भारताची कक्षा ओलांडू शकलेला नाही. केवळ बौध्द धम्मानेच भारताची कक्षा ओलांडलेली आहे. याचा भक्कम पुरावा म्हणजे महाबोधी महाविहारच्या परिसरात जगातील बौध्द राष्ट्रांची बुध्द विहारं. एकूण ६३ बौध्द विहारे आहेत.त्याच बरोबर जपान, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, भूतान, मंगोलिया, चीन तपैई, तैवान,फिलीफाईन्स अशी अनेक राष्ट्रे ‘बौध्द राष्ट्र’ म्हणून ओळखली जातात. तसे ब्राम्हणी धर्मासह देशातील जितकेही धर्म निर्माण झालीत त्या धर्मांचे एकही राष्ट्र नाही. म्हणून जगात बौध्द धम्मामुळेच भारताची ओळख असल्याने स्वतंत्र भारताचे जितकेही प्रधानमंत्री झालेत त्यानी तेथील देशाच्या प्रमुखाला ‘आपण परराष्ट्रात गेल्यावर आपण बुध्दांच्या भूमीतून आलो आहोत’ अशी आपली ओळख करून दिली आहे. विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तर सनातनी वैदिक धर्माचे कट्टर भक्त. तसे अॅलन मस्कच्या X प्लॅटफॉर्मवरील Grok AI ला तीन दिवसापुर्वी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे.रोख ठोक व सत्य उत्तर देत असल्यानेच भाजप सरकारने Grok AI वर भारतात बंदी घातल्याचा आरोप होत आहे.अॅलन मस्कने भाजप सरकारला कोर्टात खेचले आहे.मोदींनी या देशाला ब्राम्हणी धर्म करण्याचा विडाच उचलला आहे. पण ते देखील विदेशातील एखाद्या राष्ट्रात गेले,तर ‘आपण बुध्दांच्या भूमीतून आलो आहोत’ असे सांगतात. या लोकांना पर्याय नाही. कारण जगात बुध्द आणि त्याचा धम्म सर्वाधिक लोकप्रिय आहे आणि राहणार आहे. त्यामुळे धम्मद्रोह्यांनी आजवर बुध्दांच्या नावावर जगातील राष्ट्रात जावून मानसन्मान मिळवला आहे.निधी जमवला आहे. याची जाणीव ठेवून लाज-शरम असेल तर एकतर बौध्द व्हावे आणि महाबोधी महाविहार हिंदू मंदिर असल्याचे खोटे सांगणे बंद करावे.
वैदिक धर्म आणि बौध्द धम्माचा काय संबंध?-
वैदिक धर्म आणि बौध्द धम्माचा काहीएक संबंध नाही. जसे नदीला दोन किनारे असतात आणि ती किनारे कधीच एकत्र येवू शकत नाही तसे वैदिक धर्म आणि बौध्द धम्म हे कधीच एकत्र येवू शकत नाहीत. वैदिक धर्म देव देवता संकल्पना,अवतार, पुनर्जन्म,ज्योतिषी,भूत पिशाश्च, यज्ञ कर्मकांड अशा अवैज्ञानिक गोष्टीवर अवलंबून आहे.अशा अवैज्ञानिक गोष्टी बुध्दांनी नाकारल्या आहेत. बौध्द धम्म पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे.अपवाद काही राष्ट्रात बुध्दांना देव वगैरे मानले जात आहे,अवैज्ञानिक गोष्टीवर विश्वास ठेवला जात आहे हे वास्तव आहे.इसा पुर्व ते सातव्या शतकापर्यंत ब्राम्हण व ब्राम्हण्यवाद्यांनी भारतातील बौध्द धम्म संपवला. सातव्या शतकानंतर खर्या अर्थाने ब्राम्हण्यवाद्यांनी सत्तांतर होईल तसे देशातील त्या त्या संस्थानातील बौध्द स्तूप व लेण्यांवर कब्जा मिळवला आणि त्या पांडव लेणी असल्याची बतावणी केली. शिवलिंग ठेवून तेथे पूजाअर्चा सुरू केली.ते पाहून विदेशी बौध्दांना बौध्द धम्मात कर्मकांड आहे असे वाटू लागले असावे. त्याचाच परिणाम विदेशी बौध्द हे बुध्दांना देव मानू लागले आहेत.सम्राट अशोक राजा यानी महाबोधी महाविहार उभारले. पण त्यानंतर गुप्त, पाल या घराण्याच्या सत्ता आल्या.त्या राजघराण्यांनी महाबोधी विहाराचा विकास केला.त्यानंतर आलेला बंगाल प्रांतातील राजा शशांक हा कडवट वैदिक धर्मिय होता. त्याने महाबोधी विहार ताब्यात घेवून ते आपल्या धर्माच्या मंदिरात परिवर्तीत केले.म्हणून ब्राम्हण दावा करतात की ते हिंदू मंदिर आहे.राजेशाही किंवा संस्थान काळात दिवसाला सत्तांतर होत असे.सत्तांतर झालेल्या संस्थानातील प्रजेलाही विजयी राजाच्या मर्जीप्रमाणे प्रसंगी धर्मही बदलावा लागत असे. पण त्यांची मूळ संस्कृती ते विसरत नसत. हा आधार घेता जरूर राजा शशांक काळात महाबोधी महाविहार वैदिक धर्मियांच्या ताब्यात गेले म्हणून विहार मूळ कुणा धर्मियांचे आहे हे विसरता येणार नाही. ज्याचे त्याच्याकडे या बेसवर स्वतंत्र भारत निर्माण झाला. त्यामुळे किमान १९५० ला संविधान लागू झाल्यानंतर तरी १९४९ कायदा रद्द करून महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात दिले पाहिजे होते. शिवाय संविधानाच्या अनुच्छेद १३ नुसार मूलभुत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे असतील तर ते काढून टाकता येतात किंवा त्या कायद्यात बदल करता येतो. महाबोधी महाविहाराच्या मूलबूत हक्कांशी विसंगत १९४९ चा कायदा आहे. बिहार सरकारचा तर्क की ऐतिहासिक परिस्थिती पाहून १९४९ चा कायदा झाला व मत की कायदा रद्द केला तर हिंदू संघटन नाराज होतील. सरकारचा तर्क किंवा मत हेच मूळी महाबोधी महाविहारच्या मूलबूत हक्काला बाधा पोचविणारे आहे. बाबरी मशिद व राम मंदिराचे प्रकरण मार्गी लावताना सर्वोच्च न्यायालयाने हिंदू लोकांच्या आस्थाचे विचार करून बाबरी मशिदच्या परिसरातील जागा राम मंदिरला जागा दिली असा निर्णय दिला.हा निर्णय महाबोधी महाविहारसाठी का लागू होत नाही? सर्वोेच्च न्यायालयाने त्वरित याचिकावर निर्णय घेवून महाबोधी महाविहार बौध्दांचे आहे तर त्यांच्याच ताब्यात द्यावे असा निर्णय दिला पाहिजे.महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात आल्यानंतर बौध्द गौतम बुध्दांना देव मानत आहेत ते पुन्हा बुध्दांना मानवपुत्र म्हणून मानतील. तत्वतः वैदिक धर्म व बौध्द धम्माचा काहीएक संबंध नाही. बुध्द हे विष्णूचा नववा अवतार आहेत हे पूर्णतः झूठ व लबाड आहे.
मनाची नाही तर जनाची तरी लाज आहे का?-
भारतात पहावे तिकडे ब्राम्हणी धर्माचीच मंदिरे दिसतात. त्यातील प्राचीन मंदिरांपैकी बहुतांशी मंदिरं ही बुध्द विहार आहेत. तिरूपती (थेरूपती), केदारनाथ, बद्रीनाथ, जगन्नाथ, पंढरीनाथ हे सारे मंदिरं बुध्द विहार असल्याचे पुराव्यानिशी सिध्द करून दाखवतो असे बौध्द भिक्खू आव्हान करत आहेत पण त्यांचे आव्हान स्विकारण्यास सनातनी वैदिक तयार नाहीत.असो.भारतीय संविधानतील कलम २५ नुसार देशातील प्रत्येक धर्मातील लोकांना आपल्या धर्माची उपासना करण्यास स्वातंत्र्य आहे. कलम २६ नुसार धार्मिक वास्तूवर मालकीसह त्याची देखरेख करण्यास स्वातंत्र आहे. त्यामुळे आयोध्यातील राम मंदिर असो अथवा देशातील कोणतेही ब्राम्हणी धर्मातील मंदिराची मालकी व देखभाल करण्याची जबाबदारी त्या धर्मातील लोकांकडे आहे. कदाचित गेल्या शुक्रवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडे यानी ‘तिरूपती मंदिरात केवळ हिंदू कर्मचारीच हवेत.’ म्हटले असावे. असे असताना आयोध्यातील राम मंदिराची जबाबदारी केवळ ब्राम्हणी लोकांकडेच आहे. त्या धर्मातील इतर जातीच्या लोकांना घेतलेले नाही. का घेतले नाही याचा जबाब मराठासह खाटीक, बुरूड, महार, मांग, मांग गारूडी, संत मातंग समाज, चांभार, चर्मकार, संत रोहिदास समाज, भंगी, संत म्हेत्तर समाज, ढोर, वीर ककय्या समाज सारख्या अस्पृश्य (एससी प्रवर्ग) जाती., धनगर, ओतारी सारख्या भटक्या (एनटी प्रवर्ग) जाती, रामोशी, बेरड, कुलगुटकी, कोचीकोरवी, कोरवी, कैकाडी, भाट, कंजराभाट, जोशी सारख्या भटके विमुक्त जमाती समुहातील (व्हीजेएनटी प्रवर्ग) जाती. तसेच बलुतेदारातील लोहार, सुतार, कुंभार, लोणार, सोनार, कासार, न्हावी, शिंपी, परिट, धोबी, कोष्टी, साळी, माळी, गुरव, गवळी, तेली, वाणी, तांबोळी इत्यादी (ओबीसी प्रवर्ग) शेकडो जाती व सनगर, कोळी, महादेव कोळी सारख्या (एसबीसी प्रवर्ग) जाती. अशा बलुतेदार, भटक्या व अस्पृश्य, वनवासी मिळून सुमारे देशातील हिंदू धर्मातील ६ हजार सहाशे जातीच्या लोकांनी विचारावे.म्हणजे सनातनी वैदिक धर्म की ज्या धर्माला हिंदू धर्म असल्याचे मानून हे लोक स्वतःला हिंदू म्हणतात त्या हिंदू धर्मात आपले व आपल्या परिवारचे काय स्थान आहे हे समजेल. शुद्र! शुद म्हणजेच गुलाम असल्याचे नक्कीच ब्राम्हण सांगतील, यात मिळमात्र शंका नाही.कोणत्याही धर्माचा सदस्य गुलाम नसतो. दुसर्या धर्मातील लोकांना गुलाम केले जाते.त्यामुळे हिंदू धर्मात जितकेही शुद्र आहेत ते मूळचे बौध्द आहेत. छत्रपती शिवाजी महाराज याना तोंडावर तुम्ही शुद्र (गुलाम) आहात असे सांगण्यास कचरले नाहीत तेथे वरील जातीच्या लोकांची लायकी सांगण्यास ब्राम्हण कधीच कचरणार नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी वैदिक धर्माचे प्रमुख शंकराचार्याना खुले आव्हान दिले होते की, अस्पृश्य, भटक्या समाजातील एखाद्या व्यक्तीला शंकराचार्य पदावर बसवावे मी धर्मातराचा मार्ग स्वीकारत नाही. शंकराचार्य याना त्यानी एक पत्र देखील लिहिले होते की अस्पृश्यता नष्ट करावी. पण त्यांचे कोणतेही आव्हान स्वीकारले नाही. कारण आपल्या धर्मात गुलाम केलेल्या परधर्मियांना शंकराचार्य करणे वैदिक धर्माचा परंपरा व संस्कृतीच्या विरोधात होते. तेव्हा हिंदू मंदिराच्या देखभाल समितीत त्या धर्मातील इतर जातींच्या लोकांनाही घेतले जात नाही तेथे इतर धर्मियांना घेणेच शक्य नाही. मग बौध्दांच्या महाबोधी महाविहार समितीत ब्राम्हण लोक कसे? मनाची नाही तर जनाची लाज बाळगून तरी ब्राम्हणांनी आपण बौध्द नाही, तर आपण महाविहाराच्या समितीत रहावे का याचा विचार केला पाहिजे. सर्वच ब्राम्हण वाईट आहेत असे अजिबात नाही. ब्रम्हवृंदामध्येही मानवतावादी, समतावादी, न्यायवादी ब्राम्हण लोक आहेत. त्यानीही महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात देण्यासाठी आपल्या जातभांवडांना सांगितले पाहिजे. सांगूनही ऐकत नसतील तर त्यानी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.
बुध्द हे विष्णूचा अवतार असल्याचा काय पुरावा?-
ज्या ब्राम्हण्यवाद्यांना महाबोधी महाविहार हे आपल्याच ताब्यात हवे असे वाटते ते म्हणतात बुध्द हे ब्राम्हण समाजाचा कुलस्वामी विष्णू देवाचा नववा अवतार आहे. त्यामुळे महाबोधी महाविहार हे विष्णूचे मंदिर आहे.पण बुध्द हे विष्णूचा अवतार कसे याचा पुरावा दिला पाहिजे ना? एखाद्याचं पालकत्व सिध्द करण्यासाठी डीएनए तपासला जातो.तसे विष्णू हा बुध्दांचा अवतार असण्यामागे वैद्यकिय पुरावा काय? प्राचीन ब्राम्हणांनी म्हटले म्हणून आजच्या विज्ञानवादी ब्राम्हणांनी बुध्द हे विष्णूचा अवतार म्हणायचे का? मग कुणीतर श्रीराम हे महम्मद पैंगबरचा अवतार म्हटले तर आयोध्यातील राम मंदिरात पूजासाठी मुस्लिमांना घेणार का? शंकर हे येशूचा अवतार म्हटले तर सोमनाथ मंदिर ख्रिश्चनाच्या ताब्यात हिंदू देणार आहेत का? देणार असतील तर बेशक महाबोधी महाविहार समितीत ब्राम्हण राहू देत. पण ब्राम्हणांना राम,कृष्ण,विष्णू, शंकर वगैरे बौध्द धम्मासह अन्य धर्मातील प्रियांचे अवतार असल्याचे मान्य नसेल तर त्यानी बुध्द हे विष्णूचा अवतार आहे असे सांगणे सोडून द्यावे तसेच अवतार नावाचा मुद्दा जगातील कोणत्याच न्यायालयात टिकणार नाही.त्यामुळे महाबोधी महाविहारातील पंड्यांनी नाटकबाजी,ढोंगबाजी बंद करावी आणि महाबोधी महाविहारावरील ताबा सोडावा.
महाबोधी महाविहारासाठी न्यायालयीन लढाई-
महाबोधी महाविहारासाठी न्यायालयीन लढाई लढली पाहिजे.महाबोधी महाविहार मुक्ती प्रकरणी संयुक्त राष्ट्र संघा (यूएन) त पोहचला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातही प्रकरण आहे.पण न्यायालयातील बहुतांशी जज्ज हे हिंदू असल्याने निर्णय देईनात. बिहार सरकारने १९४९ ला बुध्दगया मंदिर कायदा केला.पण हा कायदा स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाल्यानंतर रद्द केला पाहिजे होता.पण आजवर केंद्र व बिहार राज्यात ब्राम्हणी धर्माला मानणार्यांचीच सत्ता आल्याने त्यानी कायदा रद्द केला नाही. त्यामुळे त्या कायद्यानुसार पाच हिंदू व चार बौध्द असे ९ जणांची समिती नेमली आहे. सन २०१३ ला त्या कायद्यात बदल करून गयाचा जिल्हाधिकारी हा हिंदूऐवजी कोणत्याही धर्माचा नेमण्याची तरतूद केली.पण जिल्हाधिकारी हिंदूच राहिल याची दक्षता घेतली आहे.त्यामुळे न्यायालयीन लढाईत बौध्दांचा विजय निश्चित आहे.बौध्दांकडे भक्कम पुरावे आहेत.म्हणतील महाबोधी महाविहारात पाच पांडव आहेत,रामाची मुर्ती आहे, शिवलिंग आहे.पण पाच पांडवांच्या मुर्त्या दाखवल्या जातात त्या पाच बुध्द मुर्ती आहेत.त्या सर्व मुर्त्या एक सारख्या आहेत. पाच पांडव एका तोंडाचे नव्हते. हे त्यांनीच महाभारत काव्यातून सांगितले आहे. शिवलिंग व राम मुर्ती अलिकडे स्थापित केल्याचे स्पष्टच झाले आहे. तेव्हा महाबोधी महामहाविरावर ताबा सांगणार्या ब्राम्हणांकडे कोणताही ठोस पुरावा नाही.अगदी सोशल मीडीयाच्या एक्स अकौंट मधील Grok AI ला जरी प्रश्न केला तर ते देखील सांगेल महाबोधी महाविहार हे बौध्दांचे आहे. त्यामुळे जगात छि थू होण्यापेक्षा महाबोधी महाविहारावरील ताबा सोडावा.
सामाजिक व राजकीयस्तरावरही लढाई-
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशातील बौध्द एक झाले आहेत.देशातील अनेक भागात मोर्चे उपोषण इ.आंदोलन केले जात आहे.देशातील बौध्द जागा झाला आहे.तो आता आपला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यानी बांधलेले हक्काचे महाबोधी महाविहार ताब्यात घेण्यासाठी आरपारची लढाई करण्यास सज्ज झाला आहे. राजकीयस्तरावरही लढाई सुरू झाली आहे. संसदमध्ये खासदार चंद्रकांत हंडोरे,वर्षा गायकवाड, बळवंत वानखेडे यानी महाबोधी महाविहार मुक्तीचा मुद्दा उपस्थित केला आहे.त्याचबरोबर राज्यातील अनेक विधानसभामध्ये आमदारांनी महाबोधी महाविहारमुक्तीची मागणी केली आहे.महाराष्ट्रातील विधानसभामध्ये नितीन राऊत यानी जोरदारपणे मागणी केली आहे. बिहार विधानसभामध्ये अनेक आमदारांनीही महाविहार ब्राम्हणांच्या ताब्यातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर राजपूत, ठाकूर, मराठा इतर हिंदू धर्मातील जातीच्या लोकांनीही महाबोधी महाविहार बौध्दांचे असून ते त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे.
प्रधानमंत्र्यांची मन की बात कधी?-
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महिन्यातून एकदा रेडिओवरून ‘मन की बात’ करतात. ते स्वतःला ओबीसी समजतात.ओबीसींचे हिंदू धर्मात काय स्थान आहे हे त्यानी समजून घेवून आपण मूळचे कोण आहेत याचे चिंतन करावे आणि महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्याची मन की बात करावी. अन्यथा भिक्खू विनाचार्य व त्यांचे सर्व सहकारी बौध्द भिक्खू हे महाबोधी महाविहारच्या दारात आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला देशभरातून मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहेत. विशेषतःपाठिंबामध्ये हिंदूंचाच अधिक समावेश आहे. भले त्यानी ब्राम्हणी धर्मातील सणांची संस्कृती आणि देव संकल्पना स्वीकारली असेल पण त्यानी बुध्दांना आजही आपल्या हृदयात स्थान दिले आहे. बौध्द तर लांबच हिंदूंच महाबोधी महाविहाराचा दावा करणार्या ब्राम्हण आणि ब्राम्हण्यंवाद्यांचा निपात करेल यात शंका घेण्याचे कारण नाही. बौध्दांनी महाबोधी महाविहारसाठी आरपारची लढाईसाठी बलिदानास सज्ज झाले पाहिजे.
(देवदास बानकर
संपादक दैनिक मुक्तनायक