शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी जास्तीत जास्त लोकसंख्येने सहभागी व्हा- राहुल ढेंबरे
अहिल्यानगर (सपंत भोसले) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष.बच्चू कडू यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिंधीच्या घरासमोर शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच शेतमालाला हमीभाव द्यावा,
दिव्यांगाच्या मानधनात वाढ व्हावी या मागणीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन केलेले आहे. त्यास शिवप्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संघटनेचा जाहीर तसेच सक्रिय पाठिंबा दिला आहे.
प्रहार तसेच शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्वच सदस्य तसेच पदाधिकारी सहभागी होत असताना तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनीही सहभागी व्हावे असे आवाहन शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. प्रहारचे प्रमुख .बच्चू कडू आणि शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांच्याशी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी मशाल मोर्चास पाठिंबा दिला असल्याचे राहुल ढेंबरे यांनी आमच्या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.