पाणी कपात थांबवा किंवा पाणी पट्टी कमी करा-आप्पासाहेब ढूस

Cityline Media
0
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात प्रहारचा ठिय्या

देवळाली प्रवरा -देवळाली प्रवरा नगर परिषदेची पाणी कपात थांबवा किंवा पाणी पट्टी कमी करा.अन्यथा
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांसह सोमवार दि.२८ एप्रिल २०२५ रोजी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा आज प्रहारचे वतीने निवेदनाद्वारे अहिल्या नगरचे जिल्हाधिकारी तसेच अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक, राहुरीचे तहसीलदार, तसेच पोलीस निरीक्षक व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले असून त्या निवेदनाची प्रत माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू व प्रहारचे जिल्हा अध्यक्ष यांना देण्यात आले आहे..
 या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस,श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख चंद्रकांत कराळे,उपप्रमुख किरण पंडित, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे,राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख शरद खांदे, राजेश मंचरे, राहुरी फॅक्टरी महिला 

शहर प्रमुख रजनी कांबळे, देवळाली प्रवरा महिला शहर प्रमुख भाग्यश्री कदम, महिला शहर उपप्रमुख वंदना कांबळे, सुरेखा शिंदे, राहुरी फॅक्टरी शहर उपप्रमुख गणेश भालके, देवळाली प्रवरा शहर उपप्रमुख अशोक देशमुख, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर संघटक इमरान शेख, प्रभाकर कांबळे, सुनील कदम, सुनील सोनवणे, हेमंत विश्वासराव आदी पदाधिकाऱ्यांच्या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

       निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा शहर हे वाड्या वस्त्यांवर विखुरलेले एक प्रकारे मोठे खेडेगावच आहे..येथील नागरिक शेतीला जोड धंदा म्हणून.. शेळीपालन, गाया म्हशी पालन, तसेच कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय करतात त्यामुळे माणसांसोबत या पाळीव प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उन्हाळ्यात येथील नागरिकांना भेडसावत असतो
 आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने विहीर व बोअरची पाणी पातळी खालावत आहे..त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.. तशात, नगरपालिका आठवड्यातून एक दिवस पिण्याचे पाणी देत नाही. सबब या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने नगरपरिषदेने नागरिकांसाठी ठेवलेली एक दिवसाची पाणी कपात रद्द करावी व नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करावा. 

किंवा देवळाली प्रवरा नगरपरिषद करीत असलेल्या आठवड्यातील एक दिवसाच्या पाणी कपातीमुळे वर्षातील एकूण ४८ दिवस नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही या कपात कालावधी मधील पाणीपट्टी नागरिकांकडून आकारणी करणे अन्यायकारक आहे.. त्यामुळे १८०० रुपये वार्षिक पाणीपट्टीच्या हिशोबाने पाणी बंद कालावधीतील ४८ दिवसांचे एकूण २४० रुपये पाणीपट्टी वार्षिक पाणीपट्टीचे बिलामधून नगरपरिषदेने कमी करावी. 
      
याबाबत संदर्भीय पत्रान्वये देवळाली प्रवरा नगर परिषदेला आम्ही या बाबत विनंती केलेली आहे तथापि, नगर परिषदेने आमच्या विनंतीनुसार अद्याप पर्यत पाणी कपात बंद केलेली नाही. तसेच पाणीपट्टी कमी करण्याबाबत आम्हाला त्याचे लेखी कळविलेले नाही.

       त्यामुळे एक तर देवळाली प्रवरा नगर परिषदेने आठवड्यातील एक दिवसाची पाणी कपात तात्काळ बंद करावी किंवा, त्या बंद दिवसाची पाणीपट्टी कमी करून नागरिकांवर होणारा अन्याय दूर करावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या 

मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सोमवार दिनांक २८/०४/२०२५ पासून येथील नागरिकांसह ठिय्या आंदोलन करणेत येणार आहे. तरी, वरील दोनपैकी आमची कोणतीही एक मागणी तात्काळ मान्य करावी अन्यथा, या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सर्वस्वी देवळाली प्रवरा नगरपरिषद जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!