संत आगमनाने नवचैतन्य प्राप्त होत धर्म साधनेकडे वाटचाल आरंभ होते-डॉ.प्रणामसागर महाराज

Cityline Media
0
आचार्य प्रणामसागर महाराज यांचे श्रीरामपूर शहरात स्वागत करण्यात आले.

 आचार्य प्रणामसागर महाराजांचे   
श्रीरामपूरात उत्साहात स्वागत

श्रीरामपूर दिपक कदम संतांच्या आगमनाने परमात्म्याकडे वाटचाल करण्याचा मार्ग सापडतो.संत आगमनाने नवचैतन्य प्राप्त होते व धर्मसाधनेकडे वाटचाल होते,असे आचार्य प्रणाम सागर महाराज यांनी सांगितले.
ज्योतिबाचार्य आचार्य प्रणामसागर महाराज यांचे श्रीरामपूर शहरात दिगंबर जैन समाज व सकल जैन समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. रस्त्यात चौकाचौकामध्ये त्यांचे स्वागत झाले.टिळक वाचनालयासमोरील आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या प्रेरणेने उभारलेल्या कीर्तिस्तंभाचे दर्शन घेतले. दिगंबर जैन मंदिरात आगमनानंतर भगवंताच्या अभिषेक व पूजन झाले. त्यावेळी त्यांनी भाविकांना उपदेश केला.

दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, विश्वस्त ॲड. सुहास चुडीवाल, माजी अध्यक्ष गुलाबचंद झांजरी, जितेंद्र कासलीवाल, मयूर पाटणी, सुभाष चुडीवाल, महावीर काला, पंकज पांडे, बहू मंडळाच्या संगीता कासलीवाल, चंदना महिला मंडळाच्या रेखा पाटणी, शांतीसागर पाठशाळेच्या अध्यापिका प्रिया अग्रवाल, वीर सेवा दलाचे प्रीतम पांडे, जैन ड्युडस, पंचामृत ग्रुप, महावीर युवा मंच, बहू मंडळ आदींसह जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.आचार्य प्रणाम सागरजी यांचे वास्तव्य कालावधीत स्तोत्र पठण, आनंद यात्रेचे आयोजन करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!