फोन पे पैसे येण्याची वाट पाहण्याऐवजी वाहकाने आजारी मुलाला बसमधून खाली उतरविले.

Cityline Media
0
वाहकाची असंवेदनशीलता लक्षात येताच नागरिकांनी केला संताप व्यक्त

आश्‍वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील पार्थ बाबासाहेब भुसाळ हा अल्पवयीन मुलगा उपचारासाठी लोणी येथे जात होता.मात्र तिकीट काढण्याकरीता त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते.त्यामुळे ऑनलाईन पैसे मागवण्यासाठी आईला त्यानें फोन केला.तरी ही बस वाहक यांनी असंवेदनशीलपणा दाखवत अर्ध्या रस्त्यातच म्हणजे दाढ बुद्रुक येथे त्याला उतरून दिले. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.तर, संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते सरुनाथ उंबरकर यांनी थेट आमदार अमोल खताळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा घटनाक्रम सांगून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली.
छायाचित्र सौजन्य गुगल
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उंबरी बाळापूर येथील पार्थ बाबासाहेब भुसाळ (वय- १६) हा अल्पवयीन मुलगा आजारी असल्याने लोणी येथे उपचार घेण्यासाठी चालला होता.संगमनेर हून लोणीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये उंबरी येथून बसला होता. यावेळी एसटीच्या महिला वाहक यांनी त्यांच्याकडे तिकीटासाठी सुट्टे पैसे मागितले. मात्र,त्यांच्याकडे सुट्टे पैसे अथवा ऑनलाईनची पैसे देण्याची सोय नसल्यामुळे त्याने महिला वाहक यांचा फोन पे नंबर आईला पाठवून ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले. 

पैसे येण्याची वाट पाहण्याऐवजी असंवेदनशीलपणा दाखवत एसटीच्या वाहक यांनी पार्थला दाढ बुद्रुक (ता. राहाता) याठिकाणी उतरून दिले. याप्रसंगी पार्थ हा हात जोडून विनंती करत असताही त्याला एसटीतून खाली उतरविण्यात आले.दाढ बुद्रुक गावात त्याचे कोणीच ओळखीचे नसल्यामुळे घाबरून तो रडत होता. त्या दरम्यानच्या काळात पार्थच्या आईने फोन पे वर पैसे पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे.


दरम्यान ही पोस्ट समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यामुळे तालुक्यातील नागरीकांनी संताप व्यक्त केला.

महिला एसटी वाहकाने अल्पवयीन आजारी मुलांसमवेत असंवेदनशील वर्तन करुन त्यांच्यातील माणूसकी मेली असल्याचे दाखवून दिले. या घटनेमुळे एसटी खात्याची मोठी बदनामी झाली आहे. त्यामुळे या असंवेदनशील वाहकांची चौकशी करून नोकरीतून बडतर्फ करण्याबरोबरच संगमनेर एसटी डेपो मॅनेजर यांचेवर देखील कारवाई करावी. अशी मागणी संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोपक्षनेते सरुनाथ उंबरकर यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे संपर्क साधून केली. तर, भीतीपोटी अशा अनेक घटना उघडकीस येत नसल्याचे सांगून भविष्यात अशा घटना घडू नये. यासाठी योग्य त्या उपयोजना कराव्यात अशी मागणी देखील उंबरकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.
बस वाहक सौ.बलमे यांची कामगिरी उद्यापासून बंद
-घडलेल्या प्रकारामुळे सांतापलेल्या नागरिकांनी बस वाहक सौ बलमे बँच नंबर १८७५७ यांची आगार व्यवस्थापक  राज्य परिवहन महामंडळ संगमनेर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता या घटनेची तात्काळ दखल घेऊन सौ बलमे यांची कामगिरी उद्यापासून पासून बंद करण्यात येईल असे व्यवस्थापकांनी सांगितले तसेच सोमवार नंतर महिला वाहकावर कडक कारवाई देखील करण्यात येईल.परीवहन खात्याच्या नियमा अंतर्गत प्रवाशांनी सुट्टे पैसे ठेवणे आवश्यक आहे.वाहकाने सदर कारवाई नियमा अंतर्गत केली असावी अनेकदा बस तपासणी झाल्यावर टिकीट नसलेल्या प्रवाशावर दंडात्मक करवाई केली जाते.अशा प्रकरणात वाहकावरही करवाई केल्या गेल्याचे अनेक प्रकरणे आहे. या प्रकरणा विषय सौ.बलमे यांची बाजु समजुन घेतल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे संगमनेर आगार व्यवस्थापक प्रशांत गुड यांनी सांगितले

 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!