श्रीरामपूर दिपक कदम श्रीमपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने सोमवार दिनांक २ मे रोजी सकाळी ११:३० वाजता श्रीरामपूर नगरपालिकेवर विस्थापित झालेल्या दुकानदारांना त्यांची दुकाने पाडले त्या जागेवर पुनर्वसन होईपर्यंत पाच फुटाची जागा द्यावी या मागणीसाठी तसेच फक्त ठराविक दुकानदारांवर नगरपालिकेने अन्याय केला याचा जबाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे.
तशा आशयाचे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेली २९ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या व राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अतिक्रमाने काढण्यात आले आहे.
त्यात सर्वात मोठी कारवाई फक्त श्रीरामपूर शहरांमध्ये काही ठराविक दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे श्रीरामपूर शहरांमध्ये अनेक धन दांडगे लोकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे त्या लोकांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करून श्रीरामपूर नगरपालिकेने गोरगरिबांच्या दुकानावर बुलडोझर फिरवून त्यांच्या दुकानाची व संसाराची राख रांगोळी करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे.
अतिक्रमण काढत असताना श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेने दुजाभाव करून फक्त गोरगरिबांचे बेलापूर रोड गोंधवणी पोलीस ठाणे तसेच भाजी मार्केट रोड नेवासा रोड या ठिकाणचे अतिक्रमण काढून त्या दुकानदारावर श्रीरामपूर नगरपालिकेने अन्याय करून उर्वरित श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणांना अभय दिले आहे.
त्याचा जाब विचारण्यासाठी व आमचे आहे त्या ठिकाणी पुनर्वसन होईपर्यंत पुन्हा दुकाने चालू करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने परवानगी द्यावी नाहीतर आम्हाला जो नियम लावला तो नियम श्रीरामपूर शहरातील सर्व अतिक्रमण केलेल्या लोकांना लावण्यात यावा या मागणी सोमवार दिनांक २ मे रोजी सकाळी ११:३० वाजता श्रीरामपूर नगरपालिका समोर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे तरी या आंदोलनाला विस्थापित दुकानदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी किशोर ओझा फयाज पठाण कैलास बाविस्कर अविनाश सुपेकर अझरुद्दीन अत्तार अक्षय गवळी रवी चव्हाण राकेश थोरात जुनेद मलिक सुनील दंडवते श्रीकृष्ण लावर अशोक लोणकर तरन्नुम शेख अश्फाक अत्तार अदनान मलिक जावेद अख्तर संदीप भावसार ऋषिकेश कासलीवाल अक्षय निकुंभ प्रदीप निकुंभ अरुण जयसिंग जयसिंग देवकाते मन्सूर बागवान आतिश बाविस्कर रमेश श्रीवास्तव गणेश कुवर सतीश चव्हाण गणेश पवार विकी चव्हाण रामू पवार किशोर कंट्रोल हरी शिरसागर बिलाल अत्तर असिफ मणियार वणेश कुवर सरदार आत्तार वसीम बागवान सलीम बागवान इम्रान बागवान आसिफ बागवान शाहिद बागवान आदी मोठ्या संख्येने विस्थापित व्यापारी उपस्थित होते