एका अपघातातून बचावलेल्या सहा मित्रांना भरघाव ट्रकने अक्षरशःचिरडले

Cityline Media
0
भीषण अपघातात सहा मित्रांचा दुर्दैवी अंत

बीड सिटीलाईन न्यूज नेटवर्क धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे.नियतीच्या या खेळात एका अपघातामधून बचावलेल्या सहा जणांना दुसऱ्याच क्षणात भरधाव ट्रकने बेदरकारपणे अक्षरशः चिरडले आहे. त्यामुळे एकदा मृत्यूच्या दावेतून बाहेर आलेल्या सहा मित्रांचा नियतीने अखेर ठरल्याप्रमाणेच अंत केला.
या दुर्दैवी घटनेने एकच खळबळ उडाली आहे:मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाच्या बातमीने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावरून एका एसयूव्ही कारमधून सहा जण प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असल्याने गाडी भरधाव वेगाने जात होती; मात्र अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकली.यावेळी कारमधील काहींना किरकोळ मार बसला मात्र कारचे काही प्रमाणात नुकसान झाले. अशातच डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी

गाडीतील सर्व जण बाहेर आले आणि येथेच नियतीने घात केला. या दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक देत अक्षरशः चिरडत नेले आणि यात त्या सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपधात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे.

बाबू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा या अपघातात मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच जखमी तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेत कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर ट्रकचालक ट्रासह घटनास्थळावरून फरारी झाला आहे. त्यामुळे पोलीस या ट्रकचालकाचाही शोध घेत आहे; मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!