पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी भरीव निधी देणार : आ.खताळ
संगमनेरात आमदार अमोल खताळ यांनी अहिल्याबाई यांना केले अभिवादन
संगमनेर :प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक भरण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. योग्य जागा उपलब्ध झाल्यास स्मारक उभारण्यासाठी शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देऊ अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त संगमनेर बसस्थानक परिसरात महायुतीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले . यावेळी बोलताना आ. खताळ म्हणाले की गेल्या सहा महिन्या पूर्वी संगमनेर तालुक्यातील जनतेने ऐतिहासिक परिवर्तन घडवले आहे. आपण आमदार झाल्यापासून सर्वच महापुरुषांच्या जयंत्या उत्साहात साजऱ्या करत आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आदर्श महिला प्रशासक होत्या. मुघलांनी नष्ट केलेली मंदिरे पुन्हा उभारण्याचे कार्य त्यांनी केले. भारतात सर्वाधिक मंदिरे बांधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकार मार्फत विविध सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत असे आमदार खताळ यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी आमदार खताळ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासह छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या .यावेळी महायुतीचे गुलाब भोसले, संदिप देशमुख पायल ताजने, रविंद्र दातीर, कैलास कासार, ॲड संदिप जगनर, मंजाबापू साळवे ,मच्छिंद्र शेरमाळे, शिवाजी शेरमाळे, कोंडाजी कडनर सुधाकर गुंजाळ , अशिष कानवडे, शशांक नमन, कोंडाजी कडनर, संतोष बलसाने, नवनाथ वावरे, संपत बुरुंगुले, मंजाबापु साळवे, अमोल गायकवाड, सुरजित खेमनर, रणजीत जाधव, दिपक भगत, रमेश काळे, , बुवाजी खेमनर, राजेंद्र सांगळे, भारत गवळी, संपत गेठे, महेश मांडेकर, संदेश देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.