जोर्व संस्कृतीचे उगवते नेतृत्व; संदीप तथा बंटी यादव

Cityline Media
0
जोर्व संस्कृतीचे उगवते नेतृत्व;संदिप यादव 

महाराष्ट्र हे ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ असल्याचे वक्तव्य महात्मा गांधींनी केले होते.राजकीय, सामाजिक,पर्यावरणविषयक किंवा कोणतेही महत्त्वाचे आंदोलन असो;महाराष्ट्र आणि मराठी माणूस राष्ट्रपातळीवर चळवळीच्या नेहमी अग्रभागी जाणारा लढवय्या म्हणून ओळखला जातो.या पुरोगामी नेतृत्त्वाचा इतिहास थेट चक्रधर,ज्ञानोबा-तुकोबांपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या नंतर अनेक क्रियाशील कार्यकर्त्यानी आणि लोक नेतृत्वाने इथपर्यंत आणला,पण,गेल्या काही वर्षांत सारे चित्र बदलले आहे.आंदोलने रस्त्यावर कमी आणि सोशल मीडियावर जास्त लढली जाते आहेत.दुसरीकडे चळवळींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही जाणीवपूर्वक बदलविला जातांना दिसतो.भांडवलशाही,बाजारकेंद्री व्यवस्था आणि बदलती मूल्ये यामुळे जनआंदोलनांचे स्वरूपच पूर्णपणे बदलले आहे. राजकारणातील प्रत्येकाने तत्वांशी आणि विचारांशी इमान राखत राजकारण केले पाहिजे असा विचार ज्यांच्या विचारातून झिरपत राहतो ते म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव संदिप गोरक्षनाथ तथा बंटी यादव.आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
तरुणांनी नेहमी राजकारणात असतांना आपले चारित्र्य जपले पाहिजे आणि आपला सामाजिक पिंड बळकट ठेवला पाहिजे संदिप साहेबांचे राजकारणात पदार्पण म्हणजे मोठे वडील बंधू जीवन ‌यादव हे जेव्हा १९९७ ९८ मध्ये भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संगमनेर तालुका अध्यक्ष ‌होते तेव्हा भारिपचे ११ आमदार संसदेत होते आणि संगमनेरात मा.हबीब शेख नगरसेवक होते आणि  ‌याच दरम्यान संदिप हे शालेय जीवन जगत होते इयत्ता ६ वीत असतांना ते प्रथमच भारिपचे ‌प्राथमिक सदस्य म्हणून संलग्नित झाले तेव्हापासून ते आजतागायत  ‌संदिप अनेक सामाजिक चळवळीत सहभागी होतांना दिसतात असे आम्ही अनेक वृत्तपत्रातुन वाचतोय.आज ते ‌राजकारणात खुप चांगल्या पद्धतीने सक्रिय आहेत.त्याच दरम्यान संगमनेरातील सामाजिक कार्यकर्ते मा.किशोर चव्हाण हे धम्म प्रचाराचे काम करीत त्यात संदिप यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.पुढे चळवळीचा मानबिंदू ठरलेला मुंबईच्या दैनिक सम्राटाच्या बातम्या आणि प्रेरणादायी लेखामुळे त्यांच्या जाणिवा प्रगल्भ होत गेल्या.

खरेतर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकांच्या मागण्या संसदेत मांडतील असा हेतू असतो तेव्हाच मतदार त्यांना निवडून देत असतात.परंतु जेव्हा लोकांचेच प्रतिनिधी लोकांच्या विरोधात धोरणे राबवतात,तेव्हा लोकक्षोभ रस्त्यावर आला की अराजक माजते.सरकार लोकांविरुद्ध धोरणे राबवत असेल तर,त्यासाठी आवाज उठवणाऱ्या चळवळी या निश्चितच सरकारविरोधी असणार!सरकारविरोधी म्हणजे देशविरोधी नव्हे.देशाला स्वातंत्र्य मिळल्यानंतर लोककेंद्री लोकहिताचे निर्णय राबवले जाऊन चळवळींची गरज भासणार नाही अशी अपेक्षा होती,परंतु असे काही घडले नाही. ‘आपली लोकशाही ही हळूहळू लोकप्रतिनिधीशाही झाली आणि आता ती पक्षप्रमुखशाही झालेली आहे.’ काही ठराविक पक्षाचे नेते हे सगळ्या पक्षांना नियंत्रित करत आहेत.

करोडोंच्या आशा-आकांक्षा घेऊन व्यवस्थेला बाहेरून धडक मारते ती म्हणजे ‘चळवळ’!

संदिप यांना लोक प्रेमाने आणि आपुलकीने बंटी या टोपणनावाने नावाने ओळखतात वयाच्या १९ व्या वर्षी ते किशोर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे तालुका उपाध्यक्ष बनले होते.माणूस एकदा सार्वजनिक झाला की तो आपला राहिल की नाही याचे दोन ‌भरवसे असतात बंटी तेव्हापासून अनेक आंदोलनात सहभागी होतात सामाजिक कार्यात असतांना आपल्या पोटाची आबळ होऊ नये बंटी यांनी नाशिकचे सुकदेव कांबळे,दिनकर गायकवाड संगमनेरचे विजय आढाव यांच्या भक्कम साथीने मार्केटिंग ह्या व्यवसायात आपला नावलौकिक मिळवला आणि याच दरम्यान नाशिकचे संजय शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली दलित मुस्लिम ओबीसी महासंघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष होण्याचा मान मिळविला तेथुच बंटी यांची लोकसंग्राहक लोक नेतृत्व बनायला सुरवात झाली.

गेल्या सात आठ वर्षापासून चळवळींना ‘देशविघातक कारस्थाने’असेही संबोधले जाते.परंतु देशविघातक कोण आणि देशसुधारक कोण यांच्या सीमारेषा कशा ठरवणार?बंटी यांच्या मते देशप्रेम,संविधान साक्षर,राष्ट्रप्रेम यांच्या व्याख्या ठरवल्या पाहिजेत.जसे पर्यावरण जोपासणाऱ्यांना राष्ट्रप्रेमी म्हणायचे की विकासाच्या नावाखाली झाडे तोडणाऱ्यांना राष्ट्रप्रेमी म्हणायचे याचा निर्णय झाला पाहिजे.आदिवासी लोक,व्यवस्थेमुळे पिचलेली माणसे,ज्यांना तथाकथित विकासाच्या नावाखाली जगणे नामुष्कीचे झाले आहे,अशी सर्वसामान्य माणसे चळवळीत सहभागी होतांना दिसतात.चळवळी जोपर्यंत पारदर्शीपणे लोकांना सर्वकाही सांगतात.तोपर्यंत त्या खऱ्या अर्थाने चळवळी असतात असे बंटी मानतात.चळवळींमधील पारदर्शीपणा कमी झाला तर त्या चळवळी राहत नाहीत.परंतु ज्या चळवळी पारदर्शीपणे लोकांना सत्यस्थिती समजावून सांगतात, त्यांच्या बाबतीत अनेक नको ते  आरोप होऊ लागतात परंतु कार्यकत्याची क्रियाशीलता आणि विचारावरील त्याची ज्वाजल्य निष्ठा त्याला ताऊन सुलाखुन तनिष्क बनवते तरीही सच्चा कार्यकर्ता बुद्ध आणि तुकोबांच्या विचारांप्रमाणे भौतिक सुखाला गौण समजतो.

बंटी हे आपल्या जीवनात सतत कृतिशील आणि प्रयत्नवादी राहिले त्याचीच फलनिष्पती हिच आहे कि आज संगमनेरचे लोकप्रिय आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे वजनदार लोकनेतृत्व मा.महसुल मंत्री मा.आ.बाळासाहेब थोरात,मा.आ. डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, मा.इंद्रजित थोरात,आमदार लहु कानडे जेष्ठ रिपाई नेते सुधाकर रोहम विद्यमान आमदार सत्यजित तांबे,भावी आमदार जयश्री थोरात यांच्या असंख्य श्रेष्ठीच्या आणि राज्यातील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये सक्रिय असुन त्याची वाटचाल आहे आज ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आहे‌.जनसेवेतुन समाधान एक प्रकारे या पदातुन त्यांनी सिद्ध केले आहेत त्यांचा निष्कलंक आणि निर्मळ स्वभाव या पदाला साजेसा आहे.तसेच राजकीयदृष्ट्या अहमदनगर जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या जोर्वे ग्रामपंचायतीचे ते सदस्य आहेत.

शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या- उत्तुंग स्वप्नांची पुर्तता करतांना जनता परिवाराच्या स्वप्नांच्या पूर्ततेलाच त्यांनी आपलं भाग ध्येय समजले आहे.
त्यांच्या निवडीचा लोकांना सार्थ अभिमान आहे.

मृत्युलोकीं आम्हा आवडती परी! नाहीं एका हरिनामें विण!!
विटलें हें चित्त प्रपंचापासूनि!वमन हें मनी बैंसलेंसे !!धृ!!
सोनें रुपें आम्हा मृत्तिके समान!माणिकें पाषाण खडे तैसे!!
तुका म्हणे तैशा दिसतील नारी!रिसाचियापरी आम्हा पुढे !!३!!

अशा या तुकोक्ती प्रमाणे त्यांचा स्वभाव आणि संन्यस्थ वृत्तीचे जीवन निश्चितच आम्हा नवयुवकांना प्रेरणादायी दिशादर्शक आहे.त्यांच्या शुभेच्छामुळेच अनेकांची माणुस बनण्याची प्रक्रिया आरंभ होते‌.

चळवळींनी लोकांना अनेक गोष्टी शिकवल्या.जमीन हा आपला अधिकार आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात चळवळींचे योगदान आहे.देशाचे राजकारण जसे संसद भवनातून चालते तसचं रामलीला मैदानावरून,जंतरमंतर आणि आझाद मैदानावरून बिघडलेले राजकारणी वठणीवर येऊ शकते सर्वसामान्य लोकांच्या आशा आकांक्षा चळवळीच पुढे नेतात.ज्या सर्व जाती,धर्म,पंथ यांना एकत्र घेऊन मानवसमूहाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच ते चळवळी म्हणून संबोधतात.धर्माच्या नावाखाली ज्या तथाकथित चळवळी चालतात त्यांना ते ‘धार्मिक उन्माद’ हाच शब्द वापरतात सगळ्यांना चळवळीतल्या कामकाजाबद्दल सारे काही कळावे याकडे त्यांचा कटाक्ष असतो.लोकांपासून काहीतरी झाकून ठेवलये असे होऊ नये. कारण ‘लोक आणि स्वतःचे चारित्र्य’ हेच चळवळींचे भांडवल असते.अशा प्रकारच्या भांडवलास शक्यतो कोणी तडा जाऊ देत नाही.

खासगीकरणाचा सामना करण्यासाठीच लोकांनी जाणून घेतले पाहिजे जनमताचा रेटा लोकशाहीत महत्त्वाचा असतो! आंदोलनाच्या ठिकाणी जेव्हा संख्या दिसते तेव्हा ते लढे यशस्वी होतात.येणाऱ्या काळात चळवळींपुढे जागतिकीकरण, उपभोगवाद या गोष्टींचा सामना करून गोरगरीब,वंचितांचे हितसंबंध कसे टिकवायचे हा मुख्य प्रश्न असेल.संपत्तीकेंद्री रुंदावलेल्या राजकारण वाढत गेले तरी यथार्थ चळवळी त्यांना योग्य वेळी योग्य दिशेला नेतील,त्यावर काही प्रमाणात अंकुश लावू शकतील असे मला वाटते.विजय खेचून आणणाऱ्या बंटी यादव सारख्या नेतृत्वाच्या पाठीशी संगमनेरातील शोषित वंचित दुर्लक्षित घटकांनी उभे राहण्यास हवे ह्याच अपेक्षा.
नेहमी लोकांच्या सुख दुःख समयी सदैव तत्पर असलेले बंटी म्हणजे जवळपास उपभोगशुन्य स्वामीच आहे आर्थिक,सामाजिक कौटुंबिक अशा कोणत्याही क्षेत्रात वावरतांना त्याचा इतरांशी संपर्क येत असतो अशावेळी सुसंवाद साधल्यास कार्याला गती मिळते नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाची जवळीक साधत नाही,मनुष्य हा तिरस्कार भावनेच्या आधारे जगु शकत नाही,तो प्रेमाच्या आधारावर भक्कम उभा राहतो असा आत्मविश्वास आणि नेहमी सकारात्मक विचार मांडणारे मा.बंटी यादव.आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने...
अनेकांच्या सुख दुःख ‌समयी नेहमी धावून येत असतात अतिशय संवेदनशील असलेल्या दोस्तीच्या पर्वातील नवा अध्याय रचणारा तळमळीचा कार्यकर्ता,ज्याच्या जीवनात पैश्याला नेहमी दुय्यम स्थान आहे.

पैसा मिळविला की माणूस सुखी होतो अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते त्यासाठी जो तो त्वरित पैसा कसा कमवावा याचाच विचार करताना दिसतो मग संपत्तीच्या मागे पळणारा माणूस माणुस्कीला विसरतो पण पैसा हे फक्त साधन आहे हे तो विसरतो,विकत घेतलेल्या ‌सर्वच वस्तू मानसिक सुख देतील असे नाही पैश्यापेक्षा मानवता महत्वाची असे अशी माणूसपणाची भिंत जपणारे बंटी यादव म्हणजे जवळपास उपभोगशुन्य स्वामीच...
वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा..
वाढदिवस एका संयमी मनाचा..
वाढदिवस एका उज्वल भविष्याचा..
वाढदिवस समतामुलक अभियानाचा..
वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा...
वाढदिवस एका कुशल संघटकाचा..
वाढदिवस एका सुसंस्कृत विचाराचा..
वाढदिवस एका विशाल नम्रतेचा..
वाढदिवस आपल्या माणसाचा..
वाढदिवस आमच्या भाऊचा..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा साहेब 
Wish You Happy Birthday..
-महेश भा.भोसले -संगमनेर 

manavmudrasvs2021@gmail.com
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!