सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय परिषदेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शताब्दी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय परिषदे’चे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नुकतेच झाले.
परिषदेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,उद्योग,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा,सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या विकासात्मक कामांमुळे मुंबईच्या पायाभूत विकासात अमुलाग्र बदल होत आहेत. मेट्रो,अटल सागरी सेतू,कोस्टलरोड करतानाच पुनर्विकासाची कामे वेगात सुरु आहेत.यामुळे मुंबईची पूर्वीची ट्रॅफिक, वाढत्या लोकसंख्येमुळे होणारी चिंताजनक स्थिती बदलू लागली आहे.इंग्रज सत्ता काळात उद्योग व विकासासाठी ‘चेंबर्स ऑफ कॉमर्स’ने केलेले काम बहुमोल असून आगामी शंभर वर्षात देखील देशाच्या अर्थव्यवस्थेला उच्च स्थानावर नेण्यात महत्त्वाची जबाबदारी निभावेल.

 महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने लॉजिस्टिक पार्क, देशातील ११ पैकी तीन औद्योगिक कॉरीडोर, बारा पैकी सात टेक्स्टाईल पार्क महाराष्ट्रात दिले आहेत असे केंद्रीय मंत्री शाह म्हणाले.

महाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करताना अर्धा टप्पा पार केला आहे. देशाच्या ३१ टक्के परकीय गुंतवणूक मिळवण्यात व सर्वाधिक वस्तू व सेवा कर जमा करणारा महाराष्ट्र अग्रेसर असून यामध्ये राज्यातील उद्योग व व्यापाऱ्यांचे योगदान आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर यांनी पारतंत्र्याच्या काळापासून शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये देशाच्या उद्योग व विकासाचे भारतीयकरण होण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. हे एकमेव असे चेंबर ऑफ कॉमर्स आहे की, ज्यामध्ये कृषीचा देखील समावेश आहे. येथून पुढे देखील आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार, उद्योग, #शेती विकासामध्ये संधी निर्माण कराव्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या विकासात महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली असून राज्याची अर्थव्यवस्था १२ लक्ष कोटी रुपयांवरून चाळीस लक्ष कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.तर

महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करतानाच, विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून व्यापार व उद्योगासाठी पोषक वातावरण तयार केले आहे. तात्काळ निर्णय घेणारे आणि उद्योग वाढीसाठी सुरक्षित वातावरण देणारे हे राज्य आहे असे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!