डांबरीकरणाऐवजी काँक्रीटकरणाचे रस्ते करण्याचा प्रयत्न-आमदार खताळ

Cityline Media
0


वरझडी बुद्रुक।येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार खताळ यांनी दिली माहिती.

संगमनेर संपत भोसले संगमनेर तालुक्यातील सर्वच रस्त्यांची पावसामुळे  दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर तालुक्या तील रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सध्याच्या घडीला डांबरीकरण ऐवजी  काँक्रीटीकरण करण्याचा पर्याय राज्य शासनासमोर आहे.त्यामुळे आगामी काळात संगमनेर तालुक्यातील रस्ते कायमस्वरूपी टिकाऊ राहण्यासाठी काँक्रीटीकरण रस्ते करण्याचा  प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.संगमनेर तालुक्यातील वरझडी बुद्रुक येथे कांदळकर यांच्या वस्तीवर शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते रामदास दिघे उत्तम दिघे निलेश दिघे एकनाथ कांदळकर विनय कांदळकर कुंडलिक कांदळकर दामू राऊत नवनाथ राऊत अरुण कांदळकर गोविंद कांदळकर  मेजर मारुती बोडखे योगेश बोडखे अनिल कांदळकर  कृष्णा कांदळकर सोपानं कांदळकर कैलास कांदळकर पंडित  वेताळ निलेश राऊत धनगरवाडा बोडखेवाडी कदम वस्ती नवामळा परिसरातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की  या तालु क्यातील मायबाप जनतेने मला या तालु क्याचे लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे . निवडून आल्यानंतर गेली आठ ते नऊ महिन्यापासून सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन त्यांचे आरोग्य पाणी  वीज रस्ते यासारखे मूलभूत प्रश्न सोडवण्याचा  प्रयत्न सुरू आहे 

संगमनेर तालुक्यातील काही वाड्या वस्त्यांवर स्वातंत्र्यानंतरही अजून वीज पोहोचली नव्हती मात्रआपण प्रत्येक वाडीवस्तीवर पोहोचून जेवढे शक्य आहे तेवढे कामे करण्याचा प्रयत्न आहे तुमच्या परिसरा तील रस्त्याची कामे मंजूर आहे परंतु ठेकेदार करत आहे असे जर तुम्ही म्हणत असाल तर तात्काळ सार्वजनिक बांध काम विभागाच्या अधिकार्यांना चौकशी करण्याबाबतच्या सूचना देतो.

जर त्यात ठेकेदार दोषी असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल.आपल्याला फक्त इतरांसारखे निवडणुका आल्या की मंगच लोकांची कामे करायचे नाही तर कायम स्वरूपीचे टिकतील अशी कामे करायची आहेत. त्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु टप्प्या टप्प्याने आपल्याला सर्वच विकास कामे पूर्ण करायची आहे.

त्यादृष्टीने माझा प्रयत्न सुरू आहे .केंद्रात आणि राज्यात आपल्या विचाराचे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये संगमनेर विधानसभा मतदार संघावरती शिवसेना महायुतीचा भगवा फडकवला होता. तसाच  जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत  नोव्हेंबर महिन्यात बरोबर एक वर्षांनी  पुन्हा एकदा शिवसेना महा युतीचा भगवा फडक्याचा आहे. त्यासाठी सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागावे असाही सल्ला आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना दिला
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात साथ द्या!
 संगमनेर तालुक्यातील विजेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. संपूर्ण तालुक्यातून १५० विजेच्या रोहित्राची मागणी होती परंतु त्यातील पहिल्या टप्प्यात ५० विजेच्या रोहित्रे मंजूर केलेल्या आहेत त्यातून बऱ्या पैकी विजेचा प्रश्न मार्गी लागेल आणि इतरही तालुक्यात प्रलंबित असणारे विकासकामे आपल्याला पूर्ण करायचे आहे त्यासाठी विधानसभा निवडणुकीत जशी तुम्ही मला सर्वांनी साथ दिली अशीच साथ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही द्यावी 
      आमदार अमोल खताळ संगमनेर विधानसभा
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!