टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने रोजगारांच्या संधी निर्माण करणार-पालकमंत्री विखे पाटील

Cityline Media
0
प्रचार फेरीतून मंत्री विखे पाटील यांनी साधला संवाद

झरेकाठी सोमनाथ डोळे शहरात पर्यायी रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून करणार असून,टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने महीला आणि युवकांसाठीच्या रोजगाराचा प्रकल्प तालुक्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंत्री विखे पाटील शहरातील प्रभागांमध्ये नागरीकांच्या भेटी घेतल्या.शहरातील प्रश्नाची संख्या मोठी आहे.अनेक वर्ष समस्या सुटल्या नाहीत पण आम्ही शहराचा विकास आरखडा तयार करताना नागरीकांच्या सूचनांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.

अनेक प्रभागांमध्ये रोजगाराची समस्या महीला आणि युवकांनी बोलून दाखवली आहे.यावर उपाय म्हणून महीला बचत गटांना पाठबळ देण्याची भूमिका घेवून आयटीआय झालेल्या तरूणाना प्राधान्याने शिर्डी येथील औद्योगिक वसाहती मध्ये रोजगार देण्यासाठी काम करू.
संगमनेर तालुक्यात मोठ्या जागा मिळाली तर उद्योग आणण्यात कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील रस्ते विकासाच्या दृष्टीने मोठे काम करावे लागेल.पावसाच्या पाण्याचा नविन नगर रस्त्यावरील दुकानदारांना  होणारा त्रास गंभीर असून,लटकत्या वीज वाहक तारा ड्रेनेजच्या समस्या सोडविण्यासाठी यापुढे प्राधान्य असेल 

आमदार‌ अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात पालिकेत काम करण्यासाठी ठेकेदारांच्या बरोबरीने सल्लागार नेमण्याची प्रथा बंद करण्यात येणार असून
ठेकेदाराच्या विळख्यात अडकलेली पालिका आपल्याला मुक्त करायची आहे.कोणत्याही विकास कामांवर होणारा खर्च नागरीकांच्या माहीतीसाठी जाहीर करून कामात पारदर्शीपणा आणण्याचे आश्वासन दिले.

मंत्री विखे  यांनी नवीन नगर रोडवरील व्यापारी दुकानदार यांच्या भेटी घेवून महायुतीचा वचननामा सुपूर्त करून महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!