हंगेवाडी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी गावातील रहिवासी असलेले भाऊसाहेब गेणु काकडे यांनी येथील गणेश खिंड येथे 'गणेश खिंड' नावाचे रसवंती गृह सुरू केले असून नुकतेच या रसवंती गृहाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
प्रसंगी गावातील आर्थिक सामाजिक क्षेत्रातील राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल शेळके सुभाष रोहीदास गागरे वंरुडी गावचे सरपंच,भागवत सखाहारी बस्ते ,बाजीराव मुरलीधर पाटोळे,भाऊसाहेब राजाराम गागरे, बाबासाहेब काशीनाथ गागरे,नवनाथ पंढरीनाथ गागरे, चंद्रभान केरु भोसले,साहेबराव मल्लारी गागरे, नारायण भिवाजी गागरे,अन्ना वेनु वर्पे बाळासाहेब चांगदेव वर्पे भाऊसाहेब संभाजी भोसले,विमा किसन वाघ,पोपट विठोबा कातोरे, प्रकाश बाळू गागरे,मच्छिंद्र बबन केदार, इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..
