लोकांसाठी..लोकक्रांतीसाठी..सिटीलाईन न्युजची घौडदौड...

Cityline Media
0
संपादकीय: घडलेल्या घटनेचा अर्थ लावत जो लिहितो त्यास पत्रकार म्हणतात,तो जागल्या असतो कारण त्याच्या निवेदनात तथ्थे, कल्पना व लोक यांचा संवादावरील अहवालांचे उत्पादन आणि वितरण जे दिवसभराच्या बातम्या आहेत आणि ते समाजाला किमान काही प्रमाणात अचूकतेची माहिती देतात,त्यांच्या माहिती गोळा करण्याच्या पद्धती आणि साहित्यिक शैली आयोजित करण्यासाठी जे लागू होते ते म्हणजेच पत्रकारिता. 
 पत्रकारितेसाठी योग्य भूमिका वेगवेगळ्या देशांनुसार बदलते,जसे की व्यवसाय बद्दलच्या धारणा आणि परिणामी स्थिती असते.आपण सरकारपासून स्वतंत्र आहोत आणि खाजगी उद्योग म्हणून काम करतो याव्यतिरिक्त,देशात भाषण स्वातंत्र्य प्रेसचे स्वातंत्र्य तसेच निंदा आणि बदनामी प्रकरणे हाताळणाऱ्या कायद्याची वेगवेगळी अंमलबजावणी आहे. आपल्या घटनाकाराने भेद,गरिबी आणि श्रीमंती या तथ्याचा किस पाडून आर्थिक निकषावर काम करत स्वतंत्रता समता बंधुता व न्यायावर आधारित भारत राष्ट्र निर्माण केले.

समाज माध्यमावर नियमित सक्रिय असलेल्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना आमचा नमस्कार आम्ही आजपासून सिटीलाईन न्यूज वेब न्यूज पोर्टल चॅनेल डिजिटल मंचावर गुगल इंजिनच्या साह्याने माहितीच्या महासागरात समाविष्ट होत,आमच्या असंख्य वाचकांच्या भेटीला नियमित येत आहोत याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.या ज्ञानाच्या महासागरात आपल्या सर्व वाचक प्रेक्षकांचे स्वागत! सिटीलाईन न्यूजच्या माध्यमातून रोज नवनवीन विषय हाताळत सर्व वाचकांचे संपूर्ण वैचारिक समाधान आम्ही करणार आहोत. कौलाघात माहिती मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले.स्मार्टफोन आणि गुगल इंजिन मुळे जग जरी एका क्लिकवर आले असले तरी ज्ञानाचे अधिष्ठान असलेले पत्रकार हा किल्ला कायम लढवत राहतील आणि डिजिटल युगातील वृत्तपत्रासमोर कितीही आव्हाने उभे ठाकले तरी प्रज्ञावंत ते आव्हान लिलया पेलतील आणि पत्रकारितेचा ऱ्हास ही फक्त अफवा ठरेल.कारण सत्यशोधक पत्रकारिता ही नेहमी निर्णय घाव घालत असते. स्मार्टफोनच्या वापरात झालेली वाढ आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धेमुळे बातम्या आणि इतर अनेक विषयावर माहिती अगदी सहज मिळु लागली आहे.याचा परिणाम म्हणून वृत्तपत्र वाचण्याची लोकांची सवय हळूहळू कमी होत चालली आहे हे मात्र नाकारता येत नाही.पण समाज माध्यमं जर अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे असेल तर नक्कीच बुरसटलेल्या व्यवस्थेला ठिणग्या बसतील हे तितकेच खरे! 

पत्रकारितेची तुलना वॉचिंग डॉग किंवा ऊसाच्या फडातून जाण्याची केली जाते तो जसा जागल्या ठरतो तसा फडातुन जाताना काटेरी संकटांना तोंड द्यावे लागते.समाजातील अन्याय अत्याचार गुन्हेगारी आणि इतर घातक प्रवृत्तीवर प्रकाश टाकताना पत्रकारांना अनेकदा जीवघेण्या धोक्यांना सामोर जावे लागते.विषमता आणि शोषण या सामाजिक अन्याय विरुद्ध आवाज उठवणारे पत्रकार हे अनेकदा हल्ल्याचे बळी ठरतात.पत्रकारावरील हल्ले हे केवळ त्यांच्यावरच नाही तर संपूर्ण समाजावर केलेले ‌हल्ले असतात पत्रकार हे लोकशाहीचे रक्षक असतात त्यांच्यावर होणारे हे हल्ले आभिव्यक्ती स्वातंत्र्यावर,माहिती अधिकारावर केलेले हल्ले असतात या हल्ल्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.आणि ते स्वतंत्रपणे काम करण्यास कचरतात त्याचा परिणाम म्हणून समाजाला सत्य माहिती मिळवण्यास अडथळा निर्माण होतो आणि लोकशाही कामकुवत होते.पण हल्लेकर्त्यानी आणि अन्यायी व्यवस्थेने कुठल्याही पत्रकाराला हलक्यात घेऊ नये!तर तो जर जातीवर आला तर कुणाचेही गलबत बुडवू शकतो हा गर्भित इशारा समजा!

सध्या देशात पक्ष फुटीचे पेव फुटले आहे,केंद्रस्थानी आणि बहुतेक राज्यात एकाच पक्षाची राजवट असल्यामुळे सगळीकडे  
युत्या आघाड्यांचे राज्य त्यामुळे कोणाचा पायपोस कोणात नाही जनहितापेक्षा स्वहिताकडेच अधिक लक्ष अशा परिस्थितीत जिकडे-तिकडे भ्रष्टाचार,अनाचार अत्याचार बलात्कार चोऱ्या दरोडे यांचा बोलबाला ऐकायला वाचायला आणि पाहायला मिळतो जनजीवन रक्तबंबाळ तर सत्ताधीशांचे जीवन चंगळवादी देशद्रोह,दहशदवाद ही जणू जीवनशैलीच बनली आहे हे आहे सामान्य भारतीयांचे अनुभव,देश आता सर्व अर्थाने जर्जर झाला आहे त्याला खऱ्या अर्थाने व्यक्ती स्वातंत्र्याची,मानसिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे.कारण भाकरीच्या प्रश्नापेक्षा व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे. 

संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही व्यवस्थेच्या विरोधात लढत असताना आणि गावांचे दौरे केले अनेक ठिकाणी विकास दिसला तर काही गावे असे दिसले की हे आपल्या राज्यातील गावे आहेत असे खेदाने म्हणावे लागले आणि तो एक वेगळा अर्ध विकसित महाराष्ट्रच मानावा लागेल असे वाटले.असो!आज राज्य अनेक प्रश्नांनी पछाडलेले आहे. विकासाचे तर केव्हाच तीनतेरा झाले आहे.राज्यात पाणी,एसईझेड (विशेष आर्थिक क्षेत्र) भांडवलशाहीचे भक्कम ‌अधिष्ठान रस्ते जातीयवाद शिक्षण संविधान विरोधी कारवाया शेतकरी आत्महत्या राजकीय लोकांची अतिरिक्त संपत्ती,शिक्षण सम्राटकडून होणारे शोषण साखर सम्राटांचा अन्यायी होरा त्यात आपलेच काही हडेलहप्पी राजकारणी,खऱ्या शासकांचे डाव,प्रतिडाव भारताला स्वातंत्र्य मिळाले पण जाताना इंग्रज सरकार सत्तेच्या चाव्या भारतातील मूठभरांच्या हातात देऊन गेले.तेच मूठभर म्हणजे खरे!शासक आता आलटून पालटून सत्ता भोगत आहे आणि प्रश्नांची खरी जाण असलेल्या प्रतिनिधींना संसदेत येऊ देत नाही. अशावेळी इतर प्रतिनिधींनी विद्रोह आणि बंड केले तर त्यांना विविध पद्धतीने शमविले जाते त्यातून अनेक दलाल भडव्यांची फौज निर्माण झाले आहे.पूर्वी मतपत्रिकेत होत.आता ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करून त्यांच्या पद्धतीने निकाल लावला जातोय आणि समाजातील प्रश्नांची जाण ‌असलेल्या शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकातील प्रतिनिधीला संसदेत जाण्यापासून रोखले जातेय असा ‌एक मतप्रवाह निर्माण झाला आहे असो!त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज दाबला गेला पण आता यावर तोडगा आहे कारण तुमचा एक फोन कॉल बनेल सिटीलाईन न्यूज मधून महाराष्ट्राचा बुलंद आवाज त्यासाठी एक फोन कॉल करा वाटेल तिथे साथ मिळवा.

२००५ साली मोठ्या संघर्षानंतर देशात माहिती अधिकार अधिनियम कायदा लागू झाला आणि अगदी परिराणीच्या छडी सारखे सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर पडू लागले अधिकारी धास्तावले तर काही निर्भिड अधिकारी कर नाही त्याला डर कशाला असे बिधास्त राहिले ज्यांचे हात काळे होते त्यांना सुट्टी नव्हती त्यानंतर अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर जिवघेणे हल्ले देखील झाले आहेत आणि आज काही माहिती अधिकार प्रशिक्षक अधिकाऱ्यांना विनामूल्य हुशार करतात मग हे दोघे मिळून अर्जदाराची दिशाभूल करतात त्यात माहिती आयोगाची भूमिका देखील अनेकदा संदिग्ध असते.त्यामुळेच हा कायदा तडजोड अधिकार अधिनियम बनतो की काय असे खेदाने म्हणावेसे वाटते.

पत्रकारिता एक उदात्त आणि ती समर्पित भावनेने केली जाते पत्रकारांचा उद्देश समाजाला शहाणं करणं,जागे करणे इतकाच असतो.जागं करणाऱ्याला शिक्षा नको संरक्षण द्या! 

सिटीलाईन न्यूज या डिजिटल मंचावरून दैनंदिन बातमीदारीत केवळ सत्य माहिती प्रकाशित केली जाईल,पुढाऱ्यांचे अवयव खाजवणारी आमची पत्रकारिता नाही,इथे कुणाचेच लांगूनचालन केले जात नाही.आमची बांधिलकी फक्त सत्याशी आहे. असत्य बातमी,माहितीला आमच्याकडे कवडीचीही किंमत असणार नाही.त्यासाठी समाज माध्यमावर सर्वच माध्यमातून नियमित सक्रिय असलेल्या सर्व वाचक प्रेक्षकांना आमचे कळकळीचे आव्हान आहे की आपण सिटीलाईन न्यूजच्या या वेब न्यूज पोर्टल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या वॉलवर शेअर करा आपली मनस्वी कृतज्ञता..!
महेश भा. भोसले 
संपादक सिटीलाईन न्यूज
www.citylinenews.in
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!