प्रजासत्ताक दिनानिमित्ताने डोंबिवली शहरात आंबेडकरवादी संघटनेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात.
डोंबिवली(प्रतिनिधी) डोंबिवली येथील आंबेडकरी संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथे कीर्तनाच्या स्वरूपात विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
प्रसंगी काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ह.भ.प.ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांनी कीर्तनातून सकाळच्या प्रथम सत्रात संविधान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संतांचे चरित्रे,गाथा, सामाजिक आणि प्रासंगिक जिवनावर त्यांनी प्रकाश टाकला तेव्हा सर्वत्र वातावरणात मंगलमय ऊर्जा निर्माण झाली.
संत नामदेवांच्या भागवत धर्म संप्रदायात सामाजिक न्याय,समता आहे त्यात ब्राह्मणीकरण घुसल्यामुळे विषमता, अंधश्रद्धा पाखंड घुसल्याने समतामुलक विचारांची त्यात वाताहत झाली.असा विचार या चर्चासत्रातुन व्यक्त झाला.तसेच संत तुकाराम महाराजांच्या अनेक क्रांतिकारी अभंगांचा पुर्नउच्चार यावेळी येथे करण्यात आला.कारण मनुवादी विचारांवर वार करणारी
मानवतावादी जग मान निर्माण झाले पाहिजे हा शुद्ध हेतू सर्व संतांचा होता.
कार्यक्रमाचे आभार दामोदर काकडे यांनी मानले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप गजघाट, दिनेश साळवे लक्ष्मण अंभोरे,अनंत पारदुरे विश्वमित्र गायकवाड सुमित कुनकुटे नेमचंद वाघमारे सुरेंद्र गौतम हरिश्चंद्र कांबळे राजू काकडे संजय पवार बी.आर.पंचागे विजय रणपिसे पिराजी काकडे भारत धाबे दिलीप काकडे दिपक साळवे दिपक गमरे आदी प्रयत्नशील होते.
पुढील नियोजनासाठी संघटनेच्या वतीने लवकरात लवकर बैठक बोलावण्यात येईल असे दीपक भालेराव यांनी यावेळी सांगितले.