रिपाइ नेते सुधाकर रोहम समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.

Cityline Media
0
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानित.


 संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील पिंपारणे येथील चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाचे जिल्हाध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुधाकर प्रभाकर रोहम यांना नुकताच श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे स्वाभिमानी धम्म परिषदेत तर्फे यावर्षी दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 हा पुरस्कार त्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते देऊन रोहम यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमासाठी हरेगाव तालुका श्रीरामपूर येथे विचारमंचावर शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे, रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश देठे जोर्वे येथील आंबेडकर चळवळ येथील जेष्ठ कार्यकर्ते दादू विष्णू यादव,साहेबराव यादव दिलीप यादव संगमनेर तालुक्यातील बौद्धाचार्य गौतम भालेराव ॲड.रमेश बनसोडे विष्णू हरणामे बाळासाहेब मोकळ प्रदीप आढाव,रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते बन्सी भाऊ घंगाळे सुनील संगारे गोरख श्रीखंडे दत्ता साळवे बौद्धाचार्य राजू देठे बौद्धाचार्य नानासाहेब पंडित संगमनेर तालुका भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाप्रमुख रामदास भालेराव बौद्धाचार्य रावसाहेब पराड श्रीरामपूर येथील नगरसेवक प्रकाश ढोकणे नेवासा येथील जेष्ठ कार्यकर्ते सुनील वाघमारे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना तालुकाप्रमुख पप्पू पवार नेवासा तालुका प्रमुख संजय पवार राहता तालुकाप्रमुख बाबासाहेब दिवे 

कोपरगाव तालुकाप्रमुख सिद्धार्थ मेहेरखांब शहर अध्यक्ष सचिन अशोक शिंदे आदीसह प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुधाकर रोहम हे आंबेडकरी चळवळीतील जुने कार्यकर्ते असून त्यांचे वडील माजी आमदार प्रभाकर यांनी १६ नोव्हेंबर १९३९ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अहमदनगरला आले होते, त्यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या माजी आमदार प्रभाकर रोहम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना हरेगाव येथे नेले होते.हा इतिहास सर्वत्र लिखित आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या कुटुंबातील एक ज्येष्ठ आदर्श व्यक्तीमत्त्व सुधाकर रोहम यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सुधाकर उच्चशिक्षित असून त्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा देऊन आंबेडकरी चळवळीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ समाजामध्ये रुजविण्यासाठी मोठे योगदान दिले असून त्या योगदानापोटी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यांना हा पुरस्कार दिल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.लवकरच संगमनेर येथे स्वाभिमानी धम्म परिषद आयोजन करणार असल्याचे सुधाकर रोहम यांनी सांगितले या परिषदेसाठी भीमराव आंबेडकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार असल्याचे रोहम यांनी सांगितले.संपुर्ण महाराष्ट्रातून भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रिपब्लिकन पक्षाचे व आंबेडकर चळवळीतील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!