संगमनेर (प्रतिनिधी) वाहुतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या शहरात बस प्रवासी देखील तितकेच महत्वाचे असतात.शासनाने अनेक सुविधा बस प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या आहे,मात्र श्रीरामपूर आणि संगमनेर येथील प्रवाशांना त्याचा फायदाच होत नाही. येथील प्रवाशांची चांगलीच ससेहोलपट होत आहे.कोरोना काळापासून बंद असणाऱ्या श्रीरामपूर आणि संगमनेर मागें मुंबई या दोन्ही बसेस तात्काळ सुरू करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष नामदार भारत गोगावले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस डेपो व श्रीरामपूर बस डेपो यांनी त्यांच्याच मर्जीने या दोन्ही बस बंद केल्या असून यामुळे नागरिकांना मुंबई येथे जाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या अनेक एसटीच्या सुविधा महिला व ज्येष्ठ नागरिक पत्रकार दिव्यांगासाठी उपलब्ध करून दिल्या,परंतु येथील बस बंद असल्याने त्या योजना कागदावरच राहिल्या आहेत.
मुंबई येथे जाण्यासाठी नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली असून येथील खासगी आराम बसेस यांच्याकडून पिळवणूक होत आहे.पाचशे रुपये आठशे रुपये हजार रुपये असे शुल्क आकारुन त्यांचा मनमानी कारभार चालू आहे.महामंडळाच्या संगमनेर व श्रीरामपूर आगार व्यवस्थापक यांचे व लक्झरी ट्रॅव्हल्स वाले यांचे लागेबंधे असून जाणून-बुजून या बसेस बंद ठेवले असल्याचा आरोप किशोर वाघमारे यांनी केला आहे.
पुढील पंधरा दिवसांमध्ये या दोन्ही डेपो मधून सकाळी दोन व संध्याकाळी दोन अशा बसेस सुरू कराव्यात अन्यथा आमरण उपोषण आंदोलन केले जाईल. असा इशारा जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांच्यासह ॲड.रमेश बनसोडे संगमनेर तालुकाप्रमुख मंजाबापू साळवे उपतालुकाप्रमुख गोरख बनसोडे गौतम रोहम श्रीरामपूर तालुकाप्रमुख पप्पू पवार शंकर पोळ बाबासाहेब भालेराव करण साठे सतीश अभंग श्रीकांत त्रिभुवन आशिष गाडेकर विशाल खरात शरद भालेराव पप्पू मोकळ आकाश अभंग राजेंद्र अहिरे आधी कार्यकर्त्यांनी दिला आहे.