निमगाव कोऱ्हाळे ग्रामसभेत ठराव मंजूर
शिर्डी(प्रतिनिधी) देशात सध्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यात अनेकांना अनाकलनीय पराभव पत्करावा लागला.त्या सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात आल्या होत्या मात्र अनेक ठिकाणी या मशीन बाबत जनतेमध्ये साक्षरता नाही,संभ्रम आहे
त्यात हे मशीन संशयाच्या भोवऱ्यात आहे असा एक मतप्रवाह देखील देशात निर्माण झालेला आहे.भारत, महाराष्ट्रातील खऱ्या शासकाडून प्रश्नाची जाण असलेल्या प्रतिनिधींना पराभूत केले जातेय असा दाट संशय अभ्यासू आणि जाणकार लोकांमध्ये निर्माण झाला आहे.असे मत भिमशक्ती सामाजिक संघटना राज्य संघटक सिमोन ठकाजी जगताप यांनी व्यक्त केले.
राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील ग्रामसभेत सुचक शिमोन जगताप यांनी हा ठराव मांडला की सध्या देशात राज्यात झालेल्या निवडणुका मशीनद्वारे पार पडल्या त्या सर्व बॅलेट पेपरवर म्हणजे मत पत्रिकेवर घेण्यात याव्यात असा ठराव ग्रामसभेत मांडला सदरच्या विषयावर उपस्थित ग्रामस्थांनी आपापसात चर्चा करून यापुढील सर्व निवडणुका मतपत्रकेवरच घेण्यात याव्यात अशी मागणी लावून धरली सदरचा ठराव हा सर्वानुमते मान्य करण्यात आला त्यास शामकांत कातोरे यांनी अनुमोदन दिले.