विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना श्रीरामपूर नगरपालिका बांधून देणार भव्य व्यापारी संकुल
श्रीरामपूर (दिपक कदम) श्रीरामपूरातील अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत असताना येथील विस्थापितांचे पुनर्वसन झाले पाहिजे,त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळाली पाहिजे. श्रीरामपूर शहरात नगरपालिकेने अतिक्रमणाची मर्यादा ठरवून बॉण्ड्री करून दिली पाहिजे,या मागणीसाठी येथे श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे आंदोलन सुरू होते मात्र अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर विस्थापितांचे आंदोलन नुकतेच स्थगित करण्यात आले.
संयोजक सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली येथील गांधी पुतळा या ठिकाणी १२ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी पर्यंत धरणे आंदोलन सुरू होते त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे धरणे आंदोलनाचे रूपांतर २१ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणस करण्यात आले त्या आमरण उपोषणास विस्थापित झालेले ४० व्यापारी सामूहिक आमरण उपोषणास बसले होते.
अखेर आंदोलनाला सोळाव्या दिवशी यश आले आमरण उपोषण करत असताना तीन व्यापाऱ्यांची तब्येत अचानक खालवली होती त्यातील एका रुग्णाला येथील हृदयरोग तज्ञ डॉ.दिलीप शिरसाट यांच्या दवाखान्यामध्ये अति दक्षता विभागात दाखल केले इतर दोघे उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे दाखल करत त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले होते.
इतर उपोषणकर्त्यांची तब्येत जास्त खालवत चालल्यामुळे प्रशासनाने दाखल घेऊन नगरपालिकेने पुनर्वसन करण्यासाठी श्रीरामपूर शहरातील सरकारी जागेचे नगरपालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवले असून ते प्रस्ताव मंजूर झाल्यास लगेच त्या जागेवर श्रीरामपूर नगरपालिका मोठे व्यापारी संकुलन बांधून विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पुनर्वसन करण्यात येईल असे लेखी आश्वासन श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांना पत्र दिले.
प्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेचे श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले तसेच लोणी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे शिष्टमंडळ भेटले असता त्यावेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले की श्रीरामपूरातील विस्थापितांचे पुनर्वसन करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी आदेश केले आहे त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे लवकरच शासनाकडून नगरपालिकेकडे जागा वर्ग झाल्यावर श्रीरामपुरातील व्यापाऱ्यांचे युद्ध पातळीवर पुनर्वसन होणार आहे.त्यामुळे विस्थापित व्यापारी आमरण उपोषण बसले आहे ते उपोषण सोडून दोन दिवसांनी पुन्हा माझ्याकडे या मी त्या संदर्भात सविस्तर बोलेल असेही शिष्टमंडळाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते व भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिभुवन तसेच मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये प्रमुख उपस्थितीत विस्थापित उपोषणकर्त्यांना उसाचा रस देऊन आमरण उपोषण सोडवण्यात आले.
यावेळी ऋषी अग्रवाल फयाज पठाण किशोर ओझा राकेश थोरात विशाल साबद्रा संजय छाजड राजू बात्रा शांतीलाल पोरवाल असुद्दिन अत्तार जयसिंग देवकाते बिलाल आतार श्याम श्रीवास्तव शब्बीर मणियार बॉबी सहानी कैलास बाविस्कर आदिनाथ सुपेकर गौस तांबोळी मज्जित मेमन सदमान मलिक सुमन थोरात इस्माईल मेमन सूर्यकांत बारस्कर प्रदीप निकम श्रीराम निकुंभ इमरान अत्तार वणेश कुवर असर सय्यद बेबी पालकर तरन्नुम अत्तर लक्ष्मी कुवर कल्पना नरोडे मोनाली जाधव लता जाधव कविता वाघ साधना प्रभू गाडे ताई गीता ताई कल्पना भोसले इत्यादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.