प्रवरानगर (प्नतिनिधी) आपल्या जीवनात प्रामाणिकपणा असला पाहिजे सतत कार्यरत असलेल्या लोकांचे कष्टातूनच जीवन सुकर होते त्यातुन तो यशाचा उच्चांक गाठतो असे प्रतिपादन संदीप महाराज चेचरे यांनी नुकतेच केले.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित शुभेच्छा समारंभात ते बोलत होते यावेळी किर्तनकार चेचरे महाराज बोलताना पुढे म्हणाले की तुमचा आजचा प्रवास येथे संपत असला तरी पुढचा उज्वल प्रवास सुरू होत आहे.यावेळी दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन संदीप चेचरे महाराज पत्रकार कोंडीराम नेहे ,संकुलाचे प्राचार्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक सुभाष भुसाळ,उपप्राचार्या अलका आहेर,पर्यवेक्षक अनिल जाधव ,सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्राचार्य संजय ठाकरे,पत्रकार कोंडीराम नेहे, देवेश आहेर, कलिंदा कासार,रेणुका वर्पे , विद्यार्थी जगदीश आहेर ,युवराज काळे, सुजय म्हसे ,मयूर चेचरे, रहीम पठाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश कसबे ,संकेत भारमल ,ओम नरोडे, सौ.अश्विनी सोहनी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी नरेंद्र ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.