माध्यमिक शाळांनी संपर्क साधावा :आवाहन
अहिल्यानगर:(प्नतिनिधी)" केंद्र शासनाच्या अटल टिंकरिंग लॅब या योजनेद्वारे माध्यमिक शाळांना २० लक्ष रुपयांचे अनुदान मिळणार आहे," अशी माहिती अहिल्यानगर येथील विकासवर्धिनी संस्थेचे संचालक विनायक देशमुख यांनी दिली.
या योजनेची अधिक माहिती देताना श्री.देशमुख यांनी सांगितले, " केंद्र शासनाच्या नीती आयोगामार्फत "अटल टिंकरींग लॅब" हा उपक्रम राबविला जातो.त्या अंतर्गत माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयाबाबत आवड निर्माण व्हावी, यासाठी अटल टिंकरिंग लॅबची उभारणी केली जाते.यासाठी मान्यताप्राप्त माध्यमिक विद्यालयांना रु. २० लक्ष इतके अर्थसहाय्य दिले जाते.यामध्ये लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबचा देखील समावेश होणार आहे."
" आतापर्यंत या योजनेसाठी लॉटरी पद्धतीने माध्यमिक शाळांची निवड केली जात असे.मात्र आता केंद्र सरकारने आगामी पाच वर्षात ५०,००० अटल टिंकरिंग लॅब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची अथवा राज्य शिक्षण मंडळाची मान्यता असलेल्या इयत्ता सहावी ते दहावीचे वर्ग सुरू असलेल्या शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आहेत .या योजनेअंतर्गत शाळांना पहिल्या वर्षी टिंकरींग लॅब उभारण्यासाठी रु.१० लक्ष व कार्यान्वयन खर्च म्हणून रु. २ लक्ष दिले जाणार आहेत. त्यानंतर पुढील चार वर्षे प्रतिवर्षी रु.२ लक्ष अर्थ सहाय्य मिळणार आहे. " अशी माहिती विनायक. देशमुख यांनी दिली.