समाजसेवक डॉ.रवींद्र जाधव यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

Cityline Media
0
मानवशक्ती जागृत करणाऱ्या असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांचा हा पुरस्कार डॉ.जाधव यांचे गौरवोद्गार 

कल्याण( ऋतुजा आहिरे) प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी (शासन मान्यता प्राप्त) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई ( महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ आणि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी,बुद्धभूमी फाउंडेशन,कल्याण (प.) येथे ४ थे राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून.या संमेलनात प्रसिद्ध समाजसेवक डॉ.रवींद्र जाधव यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार-२०२५ प्रदान करण्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले असल्याची घोषणा प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी (रजि )चे अध्यक्ष साहित्यिक, निरंजन पाटील यांनी केली आहे.
 

गेल्या अनेक वर्षा पासून डॉ. रवींद्र जाधव कल्याण मध्ये अनाथ निराधार मुले, महिला,वृद्ध गोरगरीब यांच्यासाठी वृद्धाश्रम,अनाथाश्रम,वसतिगृह उभारून पुनर्वसन, संरक्षण आणि आधार देण्याचे कार्य करीत आहेत . त्याचप्रमाणे ते संविधान प्रचार प्रसाराचे कार्य देखील करीत आहेत.त्यांचे हे संविधानिक,सामाजिक कार्याची दखल घेत प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी (रजि ) ने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.

डॉ.जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांना मानणाऱ्या हजारो  चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. " हा पुरस्कार आपल्या एकट्याचा नसून माणुसकी धर्माच्या या कार्यात शेकडो मदतीचे हात देणाऱ्या आपल्या सर्व दानशूर मित्रांचा देखिल आहे. " असे या पुरस्काराला उत्तर देताना डॉ.रवींद्र जाधव म्हणाले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!