मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या गलथानपणामुळे पठार भागातील रस्त्यांच्या खेळ खंडोबा-राहुल ढेंबरे

Cityline Media
0
(निधी उपलब्धता असलेला बिरेवाडी फाटा ते साकुर रस्ता अजूनही प्रतिक्षेत मांडवे बुद्रुक-टाकळी ढोकेश्वर रस्ता परिसरातील जिवघेणे खड्डे,मुळानदी पुलाचे डांबरीकरण आणि स्ट्रक्चर खराब झाले आहे)

अहिल्या नगर(प्रतिनिधी) कित्येक वर्षांपासून खड्डेमय असणाऱ्या बिरेवाडी फाटा ते साकुर रस्त्यासाठी जवळपास आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपुर्वी निधी उपलब्धता होऊन देखील अद्यापपर्यंत काम सुरू झालेले नाही.
रणखांब फाटा ते वरवंडी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असुन त्यापैकीच जवळपास दोन किमी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि वन विभाग यांच्या समन्वयाच्या अभावामुळे प्रलंबित आहे तसेच उर्वरित रस्त्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे.

साकुर ते वरवंडी फाटा रस्त्याचे काम झाले पण संपुर्ण साईड पट्टी तसेच संपूर्ण दिशादर्शक फलक, स्पीड ब्रेकर साईड पट्ट्यांचे काम मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

पारनेर संगमनेर तालुक्यातील नागरिकांचा मुख्य दळणवळणाचा रस्ता म्हणजेच साकुर-टाकळी ढोकेश्वर रस्ता. सदर रस्त्याला मांडवे बुद्रुक (संगमनेर)-मांडवे खुर्द (पारनेर) मुळा नदी पुलानजीक संगमनेर हद्दीतील जीवघेणे खड्डे,मुळानदी पुलाचे डांबरीकरण आणि स्ट्रक्चर खराब झाले असून तात्काळ दुरुस्ती करणेबाबत शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष.राहुल बाजीराव ढेंबरे यांनी मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर/पारनेर तसेच आजी- माजी लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या निवेदनात 

साकुर टाकळी ढोकेश्वर रोड, सदर रस्त्याला मुळानदी पुलानजीक संगमनेर/पारनेर सार्वजनिक.बांधकाम.विभाग हद्दीत जीवघेणे खड्डे पडलेले असून अगदी पुलानजीक मांडवे बुद्रुक दिशेला रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे असुन प्रवाशांच्या हितासाठी ती तोडण्यात यावीत.तसेच मोठ्याप्रमाणात जिवघेणे खड्डे पडलेले असुन पुलानजीक सुरू असलेले कॉक्रीटचे काम अतिशय अरुंद आणि नवीन झालेल्या कामाला देखील खड्डे पडलेले आहेत.सदर ठिकाणाहून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. साईड पट्टी तसेच साईड गटारचे काम व्हावे. तसेच मुळा नदी पुलावरील डांबरीचा स्तर पूर्णपणे उध्वस्त झालेला असून पुलाच्या मुख्य स्ट्रक्टरचे स्टील देखील वरती आलेले असून सदर गोष्टीचा विचार करता सदरचे खड्डे व पुलावरील डांबरीकरण तात्काळ पूर्ण करावे,एखादी दुर्दैवी घटना घडण्याअगोदर सदरची दुरुस्ती तात्काळ व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय तसेच 
आमदार.अमोल खताळ आमदार काशिना दाते,
लोकनेते बाळासाहेबजी थोरात ,खासदार निलेश लंके यांना देखील देण्यात आल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!