श्रीरामपूर (दिपक कदम) शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील खंडाळा येथे शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासचे आयोजन करण्यात आले आहे.
खंडाळा येथे धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास निमित्त बैठक पार पडली.यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खंडाळ्याचे स्वयंसेवक,समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
धर्मवीर संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलेल्या क्षणापासून ते देहाचे तुकडे तुकडे करेपर्यंत सबंध महिनाभर म्हणजेच फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत अत्याचार केला गेला.परंतु संभाजी महाराज औरंगजेबासमोर झुकले नाही. संभाजी महाराजांच्या वेदनेशी एक रूप होण्यासाठी त्यांच्या सारखी धर्मनिष्ठा सर्व तरुणांना मिळावी यासाठी संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महिनाभर धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत दिवसाकाठी एकदाच जेवावे,कुठलेही व्यसन करून नये, किमान एखादी तरी आवडती गोष्ट महिनाभर सोडावी,पायात पादत्राणे घालायचे नाही असे व्रत महिनाभर आचरणात आणावे. गावोगावी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करावी,शंभूराजे पुस्तकाचे पठण करावे, तसेच संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळ वढू बुद्रुक येथून ज्योत आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तरी धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास मध्ये युवकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खंडाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.