वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
नाशिक (दिनकर गायकवाड) इगतपुरी शहरातील नवा बाजार परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई व डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ही इमारत आता शेवटच्या घटका मोजत आहे.याबात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की आतील या सभागृहाच्या बांधकाम जिर्ण झाले असून ते पडत असल्याने आतील भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने आता इमारतीच्या बाहेर थाटली आहे. मात्र तरीही ही इमारत कधीही कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा शहराचा मध्यवर्ती भाग असून येथे नेहमी वर्दळ असते,
येथे शालेय विद्यार्थी,व्यापारी, नागरिक, विक्रेते यांच्या डोक्यावर सध्या टांगती तलवार असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तात्काळ हि इमारत जमीनदोस्त करून येथे नवीन इमारत तयार करावी व लोकांची गैरसोय टाळावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सचिन चोपडे,बाळा मोरे, किशोर भडांगे, गजेंद्र बर्वे,मयूर दोंदे,मधुकर बागुल,रमेश पंडित,अविनाश तेलोरे, तुषार तावडे, गिरीश वानखेडे, संकेत कोरडे आतिश मनोहर, सनी पंडीत,भरत गवारे, रंजना साबळे, आदी उपस्थित होते.
निवेदनावर सचिन चोपडे, किशोर दिनकर भडांगे संकेत विलास कोटो,अतिष मनोहर रमेश पंडीत, मयूर कैलास दोंदे गजेंद्र बारू, अविनाश तेलोरे,आर.एंन.साबळे, रंजना साबळे श्री.बागूल,मधुकर बागुल, प्रशांत चंद्रमोरे,भरत गवारे यांच्या सह्या आहेत.