श्रीरामपूर (दिपक कदम) राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नुकतीच विटबना झाली होती या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असताना येथील शिव स्वराज्य मंच सामाजिक संघटनाच्या वतीने तीव्र जाहिर निषेध करण्यात आला.
भविष्यात कुठल्याही महापुरुषांबद्दल अपमानकारक बोलणे किंवा महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करणे असे प्रकार होवू नये म्हणून असे घटना करणारे व समाजात तेढ निर्माण समाजकंटकविरुद्ध कठोर व कडक कारवाई करुन सदर व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन श्रीरामपूर पोलिस ठाण्यात संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले.
सदर घटनेतील आरोपीस तात्काळ अटक न झाल्यास शिव स्वराज्य सामाजिक संघटनेचे वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा शिव स्वराज्य मंचचे संस्थापक अध्यक्ष सलमान पठाण युवा नेते विशाल मोजे अब्दुल शेख लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफ पठाण यांनी दिला आहे यावेळी शहराध्यक्ष अभिजीत खैरे ,तालुका अध्यक्ष वाघ ,रमिज पोपटिया ,सचिन मंडलिक ,मोईन शाह ,वामन मामा अनिल चांडवले ,सिकंदर तांबोळी,अविनाश झरेकर,अमित शेठ कुकरेजा ,नागेश साठे ,साईराम थोरात,आदी मान्यवर उपस्थित होते