केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व युवक प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे ,अविनाश म्हातेकर, सिद्धार्थ कासारे व चंद्रकांत कांबळे इत्यादी रिपाई पदाधिकारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली दलित आदिवासींचा राखीव निधी अन्यत्र वर्ग करू नये;
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर कारवाई करावी ;आदी मागण्यांसाठी केली राज्यपालांशी चर्चा.
मुंबई(दिपक कदम) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची नुकतीच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी विविध मागण्यांसाठी भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्राच्या विविध विषयांवर चर्चा केली.अनुसुचित जाती/जमातीसाठी राखीव असणारा निधी अन्य खात्यामध्ये वर्ग करण्यात येवू नये.याबाबत आग्रही मागणी केली.राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत १ ली ८ वी पर्यंतचे शिक्षण मोफत असुन त्यामध्ये वाढ करुन ९ वी आणि १० वी चे वर्ग सुध्दा राईट टु एज्युकेशन कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्यात यावेत. त्यामुळे १ ले १० पर्यंत राईट टु एज्युकेशनच्या माध्यमातुन गरिबांना मोफत शिक्षण राहील. यासाठी राज्यपालांनी हे प्रयत्न करावेत.अशी आग्रही मागणी ना. रामदास आठवले यांनी केली.