-अंगणगावात उकिरड्याला जागा आहे पण बौद्ध समाजाला राहण्यासाठी नाही.
-अंगणगाव येथील कुटुंबीयांचे येवला पंचायत समिती समोरील उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे
येवला ( प्नतिनिधी) गावातील दलितवस्ती लगतची जागा अतिक्रमण करून स्वतःच्या फायद्याला वापरण्यासाठी मागासवर्गीय कुटुंबीयांना घरकुल बांधण्यासाठी देण्यास टाळाटाळ होत आहे.त्याऐवजी तुम्ही स्मशानभूमी शेजारची जागा घ्या,असा आग्रह होत असल्याने संतप्त मागासवर्गीय कुटुंबीयांनी (नुकतेच येथील पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती दरम्यान उपोषणाची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासन जागे झाले होते.
सविस्तर असे कि अंगणगाव येथील दलित मागासवर्गीय समाजातील घरकूल लाभार्थीना मजुंर झालेल्या घरकुल योजना दलित वस्तीतील नियोजित जागेत घ्या म्हणून पंचायत समितीस लेखी निवेदन दिले होते परंतु आतापर्यंत कुठलीच कारवाई झाली नव्हती
सविस्तर असे कि.अंगणगाव येथे नुकतीच या विषया संदर्भात ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी अंगणगावचे ज्येष्ठ नेते अंबादास बालाजी बनकर यांची निवड करण्यात आली.ग्रामसभा चालू झाल्यानंतर दलित मागासवर्गीय समाजातील घरकुलांच्या जागे संदर्भात चर्चा करण्यात आली दलित वस्ती मधील घरकुलांसाठी जागा ही उपलब्ध असून देखील टाळाटाळ केली जात आहे गावठाण हद्दीत दलित वस्तीतील घरकुलासाठी राखीव जागेचा ठराव देखील या पुर्वी केलेला असताना शासनाकडून घरकुलासाठी तीन महिन्यापुर्वी पहीला हप्ता जमा झालेला असून अद्याप ग्रामपंचायत घरकुल बांधण्यास परवानगी देत नाही
दलित मागासवर्गीय समाजातील घरकूलसाठी सदरच्या जागेवर घरे न बांधता यांना स्मशानभूमी शेजारी जागा देण्यात यावी अशी भूमिका काही निवडक लोकांनी आडदांडांनी जातीयवादी मानसिकतेतून हा विषय मांडला त्यास सर्वानीच विरोध केला परंतु जागा देण्या संदर्भात सरपंच ग्रामसेवक व सदस्य यांनी बघ्याचीच भुमिका घेतली
ग्रामपंचायत मधील सदस्य सरपंच तसेच गावातील ठराविक लोकांनी दलित मागासवर्गीय समाजातील घरकूलाला विरोध केला कारण विरोध करणारे लोक व त्यांचे नातेवाईक यांची दलित वस्ती शेजारी खळ्यांची(उकिर्ड्याची) जागा अडवून धरलेली आहे तिही अतिक्रमण केलेली जागा ते तिथे घरकुल बांधण्यासाठी जागा देत नाही ती जागा गावठाणाची आहे
गावात खळ्याला (उकिर्ड्याला) जागा आहे परंतु बौद्ध समाजाला राहण्यासाठी घरकूल बांधण्यासाठी जागा भेटत नाही भेटते तर ती स्मशानभूमी शेजारी म्हणजे किती जातीयवादी मानसिकता आहे हा असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.त्यानुसार आमरण उपोषण सुरू झाले परंतु दुपारी ४ वाजता गटविकास आधिकारी यांनी या घटनेची गंभीर्य पूर्वक दखल घेऊन तातडीने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक विस्तार आधिकारी यांची बैठक बोलावली
स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे व गटविकास आधिकारी संदिप वायाळ तसेच विस्तार आधिकारी श्री मोहिते श्री.मुंडे ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे यांनी अंगणगाव येथे प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून १० पैकी ८ घरकूल जागेचा प्रश्न मार्गी लावला व २ जागेसाठी मंगळवारी १ एप्रिल रोजी सकाळी १०वाजता विशेष ग्रामसभा घेऊन दोन घरकूल जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे ठरल्यामुळे लेखी आश्वासन व जागेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे व गटविकास आधिकारी संदिप वायाळ यांच्या हस्ते निंबु पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश काळे सरपंच सौ.भारती प्रकाश गाडे उपसरपंच नितीन बनकर मा.उपसरपंच भानुदास गायकवाड नितीन गायकवाड यांची ग्रामस्थ उपस्थित होते.
उपोषण स्थळी विनोद मोहन त्रिभुवन अमोल विजय गुंजाळ विशाल नाना माळी आकाश शिवाजी मोरे ऋषिकेश मुरलीधर खुडे विजय रामा गुंजाळ राजेंद्र दौलत माळी संजय आनंदा त्रिभुवन नितीन नारायण त्रिभुवन सौरभ खंडू कांबळे नितीन जाधव राजू संजय त्रिभुवन प्रशांत अशोक वाघ राजू प्रमोद गुंजाळ सचिन रामदास माळी मयूर संतोष गायकवाड उमेश नाना माळी सचिन रमेश खैरनार किरण भाऊसाहेब मोरे,सुकदेव मोहन त्रिभुवन सौ.लक्ष्मी त्रिभुवन अश्विनी त्रिभुवन रमाबाई सांवत रेखा पाल लताबाई खैरनार शशिकला त्रिभुवन पूनम निकम शिवानी त्रिभुवन निशा त्रिभुवन अंजली त्रिभुवन लीलाबाई माळी मंगलाबाई गुंजाळ मिराबाई पिंपळे याच्यांसह अनेक महीला व पुरुष उपस्थित होते