शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा-आमदार खताळ

Cityline Media
0
-मागील वर्षी तोंड पाहून पंचनामे केल्याने काही शेतकरी झाले होते हवालदिल 
-आमदार अमोल खताळ यांचे तहसीलदार कृषी अधिकारी गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश

-अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या गावांची आ.खताळ यांच्या कडून पाहणी.

संगमनेर (संपत भोसले) मागील वेळेस तोंड पाहून पंचनामे केले होते.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती.मात्र आता अधिकाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने नुकसान झाले आहे.अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरचे तहसीलदार उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले.
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ धांदरफळ मिर्झापूर नांदुरी दुमाला कौठे धांदरफळ नांदूर खंदरमाळ आणि जांबुत या गावात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली सर्वप्रथम कोठे धांदरफळ येथील निवृत्ती म्हतारबा घुले यांच्या मालकीच्या दोन गाईंवर विज पडून  दगावल्या होत्या.त्यांच्या गोठ्याला भेट देत पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.आणि शासनाच्या वतीने जी काही मदत लागेल ती मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
    नांदुरी दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीवरती झाड पडून भिंत पडली त्या ठिकाणची आमदार खताळ यांनी पाहणी केली. तसेच याच गावातील नामदेव दगडू कोठवळ यांचा कांदा,राहुल दत्तू कवडे यांच्या काढणीस आलेल्या द्राक्ष बागेची,सुरेश काशिनाथ शेटे यांच्या कांदा शिवाजी मारुती शेटे आणि गजानन नेहे, यांची डाळिंब बागेची पाहणी आमदार खताळ यांनी केली.मिर्झापूरचे गणेश वलवे यांचा टोमॅटो ,शिवाजी रभाजी दिवटे यांची शेड नेट मधील सिमला मिरची,अशोक नाना वलवे यांचे ऊस धांदरफळ येथील बाबासाहेब खताळ यांचा गहू,सावरगाव तळ येथील सोमनाथ शंकर थिटमे तसेच साहेबराव बाळाजी कचरे  यांनी साठवून  ठेवलेल्या कांदा तसेच दत्तू गंगाधर शेळके व संतोष एकनाथ नेहे यांच्या शेतातील कांदा आणि उन्हाळी बाजरीची पाहणी आमदार खताळ यांनी केली तसेच नांदूर खंदरमाळ आणि जांबुत येथील नुकसान ग्रस्त भागाचे सुद्धा तात्काळ पंचनामे करण्यात यावे असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
   या पाहणी दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांच्या समवेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, उपतालुकाप्रमुख बादशहा गुंजाळ कोठे धांदरफळ येथील, नेताजी घुले, मारुती घुले, नांदुरी दुमाला येथील ॲड. मीनानाथ कवडे, सोमनाथ नेहे मिर्झापूर येथील अनिल निळे साहेबराव वलवे, धांदरफळ खुर्द येथील संजय खताळ कैलास गोडसे उमेश कोकणे सावरगाव तळ येथील बाळासाहेब शेटे ,शरद नेहे ,परसराम नेहे, बबन गाडे बाळासाहेब थिटमे, लक्ष्मण नेहे सुरेश भालेराव यांच्यासह तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार सुभाष कदम, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर,उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड,तालुका कृषी अधिकारी, रेजा बोडके मंडल कृषी अधिकारी पंकज कवाड, कृषी सहाय्यक भारती मोरे, कल्याणी धाडे, गंगाराम ढोले महसूलचे मंडलाधिकारी कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!