उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
आश्वी संजय गायकवाड
संगमनेर तालुक्यातील उंबरी गावच्या नागरीकांचे मागील अनेक वर्षांचे स्वप्न गावातील प्रत्येक जाती -धर्माच्या माणसाच्या योगदानातून आज पुर्ण होत आहे.येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यात गावातील सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.आज गावात महाराजांच्या आगमनामुळे गावची शोभा वाढली असून गावातील अंतर्गत वादामुळे पुतळा बसवण्याचे पुण्यांचे व जबाबदारीचे काम विखे पाटील कटुंबाला मिळाले.त्यामुळे सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि भविष्यात छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही.अशी ग्वाही मा.खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी नुकतेच करण्यात आले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थ शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही. छत्रपती शिवराय हे आपले दैवत असून ते आपल्या हृदयात आहेत.महाराजाचे विचार हे बहुजन समाजाला एकत्र घेऊन चालण्याचे होते.त्यामुळे पुतळा उभारणीनतंर गाव विकासाच्या दिशेने नेताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करुन करावे असे आवाहन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय जेव्हा असेल तेव्हा आमच्यामध्ये जात,धर्म आणि पक्ष आडवा येणार नाही हे सिद्ध केले असल्याचे गौरवोद्गार काढले. कोल्हार आणि शिर्डी या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारत शिवसृष्टी तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात डॉ. विखे पाटील यांनी यावेळी निषेध केला.हा कार्यक्रम पक्षाचा नसला तरी,पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेसाठी जो निर्णय घेतील त्याला गावांचा पाठींबा द्या.असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले असता सर्वाना भारत मातेचा जयघोष करत त्याला पाठींबा दिला.
आमच्याकडे पैशाची किंमत आजिबात नाही.आमच्यासाठी कार्यकर्त्याची किंमत ही अधिक आहे.त्यामुळे गाव शांत राहिले पाहिजे. या दृष्टिकोनातून हे काम केले.” असे अंतिमतः त्यांनी सांगितले.