देवळाली प्रवरा (प्नतिनिधी) शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी अडचणीत असताना सरकार मस्तवालपणा करत आहे सरकारने कुठलीही चालढकल न करता त्वरित शेतकरी कर्ज माफी करा आणि आम्हाला हालक्यात घेऊ नका अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रात्री टेंभा आंदोलन सुरू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून ११ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता शेतकरी कर्जमाफीसाठी श्रीरामपुरचे आमदार हेमंत ओगले यांच्या घरासमोर प्रहारचे वतीने टेंभा आंदोलन करणार असल्याचे निवेदन श्रीरामपुरचे पोलीस उप अधीक्षक,तहसीलदार यांना देताना प्रहारचें जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस,श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख चंद्रकात कराळे,श्रीरामपुर युवक तालुका प्रमुख रघुनाथ शिंदे,देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.