पाटलांसाठी गर्दी होणार नाही म्हणून शिवरायांच्या नावाचा वापर

Cityline Media
0
पाटील मोठा की छत्रपती.?
परळीतील वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ निघणारा मोर्चा आणि राहुरीतील आरोपीच्या राजुने निघणारा मोर्चा एक साम्य 

 राहुरीसह देवळाली प्रवरातील त्या घटने प्रकरणी मराठा एकीकरण समितीसह १८ पगड १२ बलुतेदारांना सोबत घेवून गुरुवारी करणार आंदोलन अश्या आशयाची समाज माध्यमावर पोस्ट वाचली आणि, मनाला प्रश्न पडला की, पाटील मोठा की छत्रपती..? त्यामुळे हा प्रकार म्हणजे चक्क छत्रपतींना पाटलाच्या पंक्तीत बसवून छत्रपतींचे अवमूल्यन केले जात आहे याचे भान अंध भक्तांना दिसत नसावे
रांजनीच्या पाटलाने महिलेची छेड काढली म्हणून छत्रपतींनी त्या पाटलाचे हात कलम केल्याचे सर्वश्रुत आहे..त्यामुळे छत्रपतींचा नावाने आंदोलन लावायचे अन त्यात महिलांची छेड काढलेल्या आरोपींची बाजू उचलून धरणाऱ्या पाटलाच्या पंक्तीत बसवून जर कुणी आमच्या छत्रपतींचे अवमूल्यन करु पाहत असेल तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही.

२६ मार्च रोजी राहुरी शहरात महाराजांच्या पुतळ्याची विटंबना कोणी माथे फिरुने केली होती त्याबद्द्ल तमाम शिव प्रेमीच्या मनात दुःख आहे..त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. व त्या घटनेतील आरोपींना पकडुन कठोर शासन झालं पाहिजे यासाठी सर्वांसोबत आम्हीही आग्रह करतो.
 
       मात्र.त्या घटनेच्या आडून कुणी कारखाना व  नगरपालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून राजकारण करु पाहत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. काल जी पोस्ट वाचण्यात आली त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केवळ दोन ओळी आणि पाटला बद्दल हातभर लिहिलेले होते.. मग गुरूवारी होऊ घातलेला मोर्चा नक्की पाटलासाठी आहे की छत्रपतींसाठी हे समजत नाही की पाटलासाठी गर्दी होणार नाही म्हणून छत्रपतींच्या नावाचा वापर केला जात आहे याचा खुलासा या आंदोलनकर्त्यांनी करणे गरजेचे आहे..

या आंदोलनकर्त्यांनी फक्त छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली म्हणून जर आंदोलन केले तर आम्ही सुद्धा त्या आंदोलनात सहभागी होऊ..मात्र ज्या माथेफिरुने आदिवासी महिलां,लेकी बाळींच्या इज्जतीला हात घातला त्यांच्यासाठी छत्रपतींच्या नावाचा वापर करून  जर कोणी आपली राजकीय डाळ कोणी शिजु पाहत असेल तर ती 
जनता शिजु देणार नाही.

 आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी असल्या गाडुळांचा कडे लोट केला असता  गुन्हे दाखल झालेल्या आरोपींसाठी असली आंदोलने करून आम्ही भावी पिढीला नक्की काय शिकवण देत आहोत.? 
       परळीतील वाल्मीक कराडच्या समर्थनात निघालेला मोर्चा आणि उद्या येथील आरोपींसाठी होऊ घातलेला मोर्चा यात बरेच साम्य आहे. आरोपींसाठी मोर्चे काढण्याचा चुकीचा पायंडा पाडण्या पेक्षा संशयित अरोपीना सापडण्याकामी पोलिसाना मदत करायला हवी.

या मंडळींच्या अंगाशी आले की, गावाच्या आड लपण्याची यांची पद्धत तसी जुनीच आहे. मग ते देवळालीतील हिंदूंचे मंदीर पाडण्याची धमकी असो.. नाहीतर मुस्लिम समाजाच्या मशिदीचे पत्रे काढणे असो... नाहीतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नगरपालिका कार्यालयातून बाहेर काढणे असो. 

प्रत्येक वेळी यांच्या बालीश कृतीतून काही घटना घडली की यांनी गाव गोळा करायचे. मग यांनीच निषेध मोर्चे काढायचे आणि दबाव गट निर्माण करून संपुर्ण गाव वेठीस धरायचे हा यांचा कायमचा फंडा झाला आहे. आणि आतातर आम्ही गावासाठी रक्त सांडले.! अशी नवीन भावनिक साद हे गावाला घालत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एक झाले पाहिजे असे सांगून नगरपालिकेच्या येत्या निवडणुकीसाठीची बांधणीचे षडयंत्र यातुन रचले जात असावे वेळ आली की,आपले राजकिय वजन वापरून स्वतःचे नाव आरोपींच्या यादीतून कमी करून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारा नेता नसावा..एकेकाळी डोळ्याच्या गोट्या काढून खेळण्याची भाषा करणारे आज स्वतःच का? रडत आहे या प्रकरणात स्वतःवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून कोणी राजकीय फोना फोनी केली से गावला ठाऊक आहे..

अंध भक्तांवर गुन्हे दाखल झाले असताना नेते मंडळीं फेटे बांधुन सत्कार स्विकारताना पाहून दुसरीकडे त्या नेत्यांच्या अंध भक्तांना पळता भुई थोडी व्हावी हे अत्यंत दुःखद आहे.

देवळाली प्रवरातील त्या रात्री आदिवासी महिलांचे छेड काढतानाचे फोटो, व्हिडिओ जर पाहिले तर कुणीही हेच म्हणेल की, हे फक्त टाळकी फोडण्यावरच कसे काय थांबले असावे.. इतका संताप येतो ते सर्व फोटो व्हिडिओ पाहून रात्री मराठा एकीकरण समितीने जाहीर केलेल्या आंदोलनाची ती पोस्ट वाचली आणि आमची सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली.. त्यामुळे सोशल मीडियात त्या पोस्ट खाली मी सरळ लिहिले की,

माझ्या घरावर हल्ला झाला तेंव्हां मराठा एकीकरण समिती कूठे होती.? देवळाली प्रवरा येथील आदिवासी कुटुंबावर हल्ला करून महिला आणि लहान मुलींची छेड काढणाऱ्या मधील काही आरोपी तेच आहेत ज्यांनी माझ्या घरावर हल्ला करून मला व माझ्या कुटुंबाला जीवंत जाळुन मारण्याचा प्रयत्न केला आहे..माझ्या आईचे त्या धक्क्याने निधन झाले आहे.. देवेंद्र लांबे मला माझी आई जिवंत करून देणार का.? कारण त्या बातमीत म्हंटले आहे की, सर्व संशयित आरोपी अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत.. मग त्यातील दोन तीन आरोपी माझ्या घरी मध्यरात्री जाळपोळ करायला कुणाच्या सांगण्यावरून आले होते.. त्यांचे विरोधात राहुरी येथील न्यायालयात तपास पुर्ण करून अहवाल मागितला असताना आंदोलनकर्ते जनतेला खोटी माहिती का प्रसारित करीत आहेत.. 

या आंदोलनाच्या बातमीत छत्रपतींची कमी आणि पाटलाचीच जास्त उदो उदो दिसतेय त्यामुळेच पाटील मोठा की छत्रपती हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणे स्वाभाविक आहे. राहुरीच्या मराठा एकीकरण समितीचे काम समाजासाठी चांगले असले तरी आपल्याकडे समाजाचा समुह आहे म्हणून आपण दुसऱ्या समाजावर होत असलेला अन्याय निमूटपणे पाहु शकत नाही.. आमच्या राजांची शिकवण आम्ही अंगीकारली पाहिजे.. एकीकडे आम्ही दर वर्षी राजांची जयंती मोठ्या धूम धडाक्यात साजरी करतो.. तर.., दुसरीकडे,  त्याच राजांच्या नावाने गर्दी जमवून आरोपींचे समर्थन करतोय.हा कुठला न्याय आहे..मला वाटते माझ्या राजांना आणि येथील कट्टर शिव भक्तांना हे कदापीही आवडणार नाही.

आदिवासी अबलेला झुंडीने घेरून तिची छेड काढली म्हणून आमची टाळकी फुटली हे कुणीही सांगणार नाही पण आम्ही गावासाठी रक्त सांडले अशी भावनिक साद घालुन जर कुणी गाव गोळा करू पाहत असेल तर गावाने आता तरी सावध होणे गरजेचे आहे.. जेंव्हा या मंडळींनी आमचे शेतातील दत्त मंदिर पाडण्याची धमकी दिली होती तेंव्हा आम्ही कायद्याचा बडगा उगारला म्हणून आमचे विरोधात यांनीच गाव बंद ची हाक दिली होती त्यात.अवैध धंदे बंद करा ही यांची मुख्य मागणी होती आमच्या विरोधातील त्या आंदोलनात काळ्या फिती लावून केवळ २५ डोकी निषेध मोर्चात सामील झाल्याने स्वतःची अब्रु राखण्यासाठी यांनी गावातील अवैध धंदे बंद करायची तुतारी नेहमी प्रमाणेच वाजवली. 

तदनंतर.गावातीलच मुरूम वाहतूक करणाऱ्या दोन लहान मुलांचे भांडण झाले म्हणून यांनी त्या भांडणाला जातीचा रंग देवून गावाला भावनीक साद घातली  व गावातील अवैध धंदे बंद करा ही मुख्य मागणी पुढे करून पुन्हा गाव गोळा केले. आणि, एका विशिष्ठ समाजाला टार्गेट करून गावात दंगल घडविण्याचा प्रयत्न केला.. तेंव्हाही आम्ही एक व्हिडिओ पोस्ट करून गावाला वस्तुस्थिती समजून सांगितल्याने बहुतेक मंडळी त्या घटनेतून बाजूला झाली आणि गाव शांत झाले होते. 
आता कालचीच घटना पहा..  आदिवासी समाजातील मुलांचा वाद होता.. मग त्या मुलांवर हात टाकण्याचा अधिकार यांना कुणी दिला? मुलाला मारले म्हणून मुलाची बहीण व आई मध्ये आले.. म्हणून महिलेची आणि लहान मुलीची भर चौका छेड काढण्याचा अधिकार यांना कुणी दिला?.. शेवटी गरिबालाही इज्जत असते.. छेड काढली म्हणून समाजात उद्रेक होणे साहजिक आहे. आपल्या माता भगिनीला जर कुणी हात लावला तर आपण ते सहन करु का?.. मग त्या लोकांनी हात उचलणे नैसर्गिक आहे.. मग त्यांनी हात उचलला म्हणून रात्री अपरात्री झुंडीने थेट त्यांच्या घरात घुसून जबरी चोरी, मारहाण, घरेलू वस्तूची तोडफोड आणि थेट त्यांच्या महीला व मुलींची छेड काढायची अवदसा यांना कसी सुचली? 
      त्या रात्री सुध्दा गावातील अवैध धंदे बंद करा.. ही मुख्य मागणी पुढे करूनच एक मोठा समुदाय या आदिवासींच्या घरावर चालून गेला होता.. तिथे त्यां जमावाने नको ते कृत्य केले.. हे वास्तव मात्र जाहिरातींच्या तुकड्यासाठी लाचार असणाऱ्यांनी जनतेसमोर मांडले नाही हे आमचं दुर्दैव म्हणावे लागेल..
 
गावातील अवैध धंदे बंद करा ही यांची वारंवार मागणी का? असते हे मला आजही न उलगडलेले कोडे आहे.. एकीकडे असे म्हणतात की, यांना थेट पंतप्रधान फोन करतात.. एकीकडे सरकार यांचे आहे, गृहमंत्री यांचे आहेत असे हे म्हणतात, एकीकडे पवार यांचे नातेवाईक आहेत असे हे सांगतात.. मग असे असताना स्थानिक पोलिस यांचे ऐकत नसावे का? साधा पोलीस  ठाण्याला एक फोन करून गावात कुठे अवैध धंदे सुरू आहेत हे पोलिसांना का सांगत नाहीत.? एका फोन मध्ये सर्व अवैध धंदे बंद होऊ शकत असतांना हे कायदा हातात घेवुन दोन लहान मुलांच्या वादात का पडत असावेत. का त्यांच्यावर हात टाकत असावेत.त्या मुलांची आई बहीण मध्ये आली तर का त्यांची छेड काढली जात असावी.. इतके होऊनही कमी की काय का? लोकांच्या घरावर हे रात्री अपरात्री हल्ले घडवून आणत असतील आणि सर्व झाल्यावर गोष्टी अंगाशी आल्या की मग छत्रपतींच्या नावाचा वापर करून लोकं जमवायची आणि आंमच्यावर अन्याय झाला म्हणत लोकांची सहानुभूती मिळवून त्याचा पुढील निवडणुकीत फायदा घ्यायचा अशी साधी सोपी पॉलिसी या लोकांची असल्याने पाटील मोठा की छत्रपती.? याचे भान हरपलेल्या लोकांनी सावध भूमिका घेणे गरजेचे आहे.
  
यांच्या अंगाशी आले की मग गावाने एकत्र आले पाहिजे अशी यांची भूमिका असते.आम्ही म्हणतो की, गावाने नक्की एकत्र आले पाहिजे.पण ते कश्यासाठी तर. गावातील यांची दहशत व झुंडशाही संपविण्यासाठी
     आजही माझ्या देवळाली प्रवरा शहराला एस टी बसस्थानक नाहीं.., पोलिस ठाणे नाही.., क्रिडांगण नाही.., ग्रामीण रुग्णालय नाही.., एखादी शिक्षण संस्था तर येथील नेते मंडळीनी उभी केली नाहीच.. साधा एखादा उद्योग या गावात आणुन येथील तरुणाईला रोजगार यांनी दिला नाही..!  गावात गरजेचा असलेला हा विकास थांबला आहे म्हणून गावाने एक होणे गरजेचे आहे..
       
गावातील बेरोजगार तरुणाईचा गैरफायदा घेवुन काही बालीश मंडळी गाव अस्थिर करीत आहेत.. गावातील तरुणांना चिथावणी देवून एकप्रकारे दरोडेखोर आणि दहशतवादी बनविण्याचे प्रशिक्षण येथे दिले जात आहे.. पालकांनो मुले सांभाळा हे आम्हीं यापूर्वीही अनेकवेळा सांगीतले आहे.तरीही काही  तरुणांना हाताशी धरून रात्री अपरात्री विरोधकांच्या घरावर हल्ले घडवून आणले जात आहेत.हे भयाण वास्तव आपणा सर्वांना मान्य करावे लागेल.आणि गावाची भावी पिढी वाचविण्यासाठी गावाने एक होणे गरजेचे आहे.
 
  माझ्या घरावर मध्यरात्री भ्याड हल्ला करून मला व माझ्या कुटुंबाचा जाळून मारण्याचा प्रयत्न झाला.त्या धक्याने आमची आई दगावली, नुकताच गावातील आदिवासी कुटुंबाच्या घरावर रात्री हल्ला करून दरोडा टाकण्यात आला.त्यात महिलांची आणि लहान मुलींची छेड काढली गेली.अश्या आणखी अनेक घटना आहेत. ज्यात गुन्हे दाखल नसल्याने त्या समोर येवू शकल्या नाहीत..परंतु या दोन घटनेतील काही गुन्हेगार एकच असल्याने त्यांचेवर संघटित गुन्हेगारी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई गरजेची आहे..व यापुढे गावात शांतता नांदेल यासाठी गावाने यकत्र येण्याची गरज आहे. 
     
आम्ही देवळालीची परळी होऊ देणार नाही. हे यापूर्वीच आम्ही सांगितलेले आहे. कारण वाल्मीक कराडने जे जे उद्योग केलेत ते सर्व या गावात सुरू आहेत..मग ते जमीन बळकावणे असेल.खंडणी असेल.. व्याजाचा धंदा असेल,मटका पेढी चालवणे असेल..गावात चोऱ्या करने असेल.त्यामुळे माझ्या गावात जन्मलेल्या वाल्मीक कराडला सर्वप्रथम गावातून हकलावे लागणार आहे. नाहीतर देवळालीची परळी होण्यास वेळ लागणार नाही.
 
या मंडळींची गावातील ही गुंडगिरी, दहशत आणि झुंडशाही थांबविण्यासाठी आणि गावातून यांना हद्दपार करून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच गावाच्या विकासासाठी देवळाली प्रवरा शहरातील सर्व समाजाच्या नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.  
       परंतु तसे न होता नको ते आंदोलने करून छत्रपतींच्या नावाचा गैरवापर करून समस्त मराठा समाज पाटलाच्या दावणीला बांधण्याचा घाट काही मंडळी घालत असून त्यासाठी सर्वांनी सावध होणे गरजेचे आहे.

       छत्रपतींच्या स्वराज्य शासन व्यवस्थेत महाराजांचा गावात संदेश पोहच करने तसेच इतर शासकिय चाकरीच्या कामासाठी छत्रपतींनी गावोगाव पाटलाची नेमणूक केली होती,त्यामुळें पाटील मोठा की छत्रपती हा प्रश्नच उद्भवत नाही.. छत्रपतींची बरोबरी कुणीही करुच शकत नाही.. 

       मात्र.. थोड्याशा लाभासाठी आज काही मंडळी छत्रपतींच्या नावाने होणाऱ्या आंदोलनात पाटलाचा विषय घेवून पाटलाच्या  पंक्तीत छत्रपतींना बसविण्याचा घाट घालून छत्रपतींचे अवमूल्यन करू पाहत असल्याने पाटील मोठा की छत्रपती हा चुकीचा प्रश्न समाजात पसरवीत आहेत हे अत्यंत चुकीचे असून.त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जावून उद्रेक निर्माण होइल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याचे भान शासन यंत्रणेने यानिमित्ताने ठेवले पाहिजे.
शब्दांकन
आप्पासाहेब भिमराज ढूस,
देवळाली प्रवरा ता. राहूरी, जि. अहील्यानगर मो. ९८२३०३५९३६
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!