नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला.देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी आयएएस तर कुणी आय पी एस तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली.
याच परीक्षेत बिरदेव डोणे ५५१ व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि आय पी एस पदाला त्याने गवसणी घातली.बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक.जळोची गावातील डाॅ
राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. मुले बिरदेवची चेष्टा करायची.प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली.
बिरदेवला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिनिअर्सचा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहू लागला. दोघांची चांगली गट्टी झाली. प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला.
पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले.नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला.या कठीण प्रवासात सीओई पी मध्येच शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेवला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली.
प्रांजल चोपडे यांची दोन वर्षांपूर्वी केंद्रीय लोकसेवा अंतर्गत फॉरेस्ट ऑफीसर म्हणुन सिलेक्ट झाले.बिरदेवचा यशाचा शोध चालूच होता.तो आज संपला नुकताच केंद्रीय लोकसेवा परिक्षेचा निकाल आला.प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेवचे नाव शोधले.
५५१ व्या क्रमांकावर बिरदेवचे नाव दिसल्यावर बिरदेवला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला. तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेउन माळावर गेलेला.तू का? मेंढरे घेउन गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मिच सध्या मेंढरे घेउन जातोय,बिरदेव उत्तरला.
बिरदेवच्या वडिलांचे किडनीच्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले.पैशाची ओढाताण असल्याने बिरदेवने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूरचाच मित्र आशिष पाटील (आयएएस) या दोघांना मदतीसाठी फोन केला होता.
आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ओळखीने तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशनची सोय केली होती. ऑपरेशन झाले पण काहीतरी बिघाड झाला (बिरदेवच्या भाषेत ऑपरेशन बिघडले). तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एस निकाल लागला त्यादिवशी त्यामुळे मेंढरे घेउन माळावर चारत होता.असा हा बिरदेवचा आय पी एस पर्यंतचा प्रवास.जाता जाता बिरदेवचा एक किस्सा सांगितला पाहिजे.
दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेवचा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली.बिरदेवने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली.
तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही बिरदेव अधूनमधून फोन सापडला का? विचारायला पोलीस ठाण्यात जात होता,तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेवला मिळत होते.
हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे.स्वतःभोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित सविधान सर्वव्यापी आहे बिरदेवचा समाजातील अन्यत्र लोकांनी देखील हा आदर्श ठेवला पाहिजे,संविधातील मुलभूत अधिकारामुळे हा मूलनिवासी नायकाचा यशाचा शोध नक्कीच लोकहितार्थ ठरेल यात तिळमात्र शंका नाही..