सिटीलाईन न्यूज नेटवर्क
महाड किल्ले रायगड परिसरातील वाळूसुरे दत्तवाडी ग्रामपंचायतीला दोन वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न करणे भोवले.वंचित बहुजन आघाडीने हे प्रकरण लावून धरल्यानंतर येथील सरपंचांना बडतर्फ करण्याचा आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.
वाळू येथील विद्यमान सरपंच व सदस्यांनी १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याच दिवशी साजरी केली नाही.शासन आदेश असतानाही जयंती साजरी न झाल्याने नागरिकांनी हे प्रकरण उचलून धरले होते.यामुळे ग्रामपंचायतीने १७ एप्रिल २०२३ रोजी जयंती साजरी केली खरी, परंतु शासन परिपत्रकानुसार कामामध्ये कसूर केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम कासारे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकून घेऊन १६ एप्रिल २०२५ रोजी ग्रामपंचायतीविरोधात निकाल देवून सरपंचांना पदावरून काढून टाकण्याचा आदेश सूर्यवंशी यांनी दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून सरपंच विरोधात तक्रार दाखल केली होती,याबाबत प्रशासनाने निर्णय घेऊन धडा शिकवला आहे व यामुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना इशारा मिळाला आहे
श्याम कासारे
जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी